
Sanjay Raut On Maharashtra Government Formation : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभेचा निकाल लागून आज आठ दिवस होऊन गेले. मात्र, अद्यापही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील झाली. मात्र, या बैठकीनंतरही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. त्यामुळे सरकार स्थापन का झालं नाही? यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र, गृहमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जातंय.
या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. “एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेलं नाही, तर यामागे वेगळी कारणं आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच महायुतीचं सरकार अद्याप का स्थापन होऊ शकलं नाही? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
|
|
संजय राऊत काय म्हणाले?
“मला एक कळत नाही. भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे. त्यांच्या पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत. मग एका गृहमंत्री पदावरून या राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे. मग हे कसले मजबूत नेते? तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे स्वत:चा बहुमताचा आकडा आहे. तुमच्याबरोबर ४० आमदार घेऊन अजित पवार आहेत. तुमच्याबरोबर शिंदे गटाचे लोक आहेत की नाही हे मला माहिती नाही. ते भविष्यात काय करतील माहिती नाही. बहुमत असताना तुम्ही शपथ घेत नाहीत. राज्याला सरकार देत नाही. राजभवनामध्ये सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. त्यात तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांचे नावे द्यायला तुम्ही तयार नाहीत. राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला? राजभवन तुम्ही चलवताय का?”, असे अनेक सवाल संजय राऊत यांनी महायुतीला केले.
“हे सरकार एका गृहमंत्री पदावरून अडकलेलं नाही. भाजपाने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करत आहेत ना? तर हे एका मिनिटात चिरडून टाकतील. हे सर्व डरपोक लोक आहेत, ईडी आणि सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत. ते स्वबळावर निवडून आलेले नाहीत. ते कसे निवडून आले? हे लोकांना माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यांना जनमताचा पाठिंबा नाही. पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेलं नाही, तर यामागे काही वेगळी कारणं आहेत का? फक्त एक गृहमंत्री पद हा सरकार स्थापनेचा वादाचा विषय असू शकत नाही. या सर्व गोष्टीचा उलगडा व्हायला हवा. अन्यथा आम्ही आमचं बंद पुस्तक उघडू”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
शहर
- कोल्हापूर हादरले: बिंदू चौक परिसरात अतिक्रमण वादातून तलवार हल्ला आणि दगडफेक; पाच जण गंभीर जखमी"
- बँक सुट्टी अलर्ट: २० ते २६ जुलै दरम्यान बँका तीन दिवस राहणार बंद; शाखेत जाण्यापूर्वी तपासा तुमच्या राज्यासाठीची सुट्टीची यादी"
- पुणे: मांजरी खुर्द-कोलवडी रस्ता की मृत्यूचा सापळा? रुंदीकरण राहूदेत, आधी खड्डे तरी बुजवा, हतबल प्रवाशांचे प्रशासनाला साकडे
- अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा: 'श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट'च्या ७ पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; २.४४ कोटींचा अपहार"
महाराष्ट्र
- कोल्हापूर हादरले: बिंदू चौक परिसरात अतिक्रमण वादातून तलवार हल्ला आणि दगडफेक; पाच जण गंभीर जखमी"
- धाराशिव: तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! ३,२९५ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचे ८५% काम पूर्ण, वर्षभरात धावणार ट्रेन
- पुणे: मांजरी खुर्द-कोलवडी रस्ता की मृत्यूचा सापळा? रुंदीकरण राहूदेत, आधी खड्डे तरी बुजवा, हतबल प्रवाशांचे प्रशासनाला साकडे
- अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा: 'श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट'च्या ७ पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; २.४४ कोटींचा अपहार"
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
- नवी दिल्ली: जंतर-मंतरवर शाईफेक, उपोषणकर्ते अभिजित दिपके यांच्यावर महिलेचा हल्ला; आरोपी महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
- नीट (NEET) निकालात मोठा गोंधळ: कानपूरच्या विद्यार्थिनीचा दावा; सुरुवातीला ६०९, नंतर ५४० आणि शेवटी १६७ गुण मिळाल्याचे दाखवले"



























Subscribe to my channel




