
Sanjay Raut On Maharashtra Government Formation : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभेचा निकाल लागून आज आठ दिवस होऊन गेले. मात्र, अद्यापही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील झाली. मात्र, या बैठकीनंतरही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. त्यामुळे सरकार स्थापन का झालं नाही? यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र, गृहमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जातंय.
या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. “एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेलं नाही, तर यामागे वेगळी कारणं आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच महायुतीचं सरकार अद्याप का स्थापन होऊ शकलं नाही? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
|
|
संजय राऊत काय म्हणाले?
“मला एक कळत नाही. भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे. त्यांच्या पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत. मग एका गृहमंत्री पदावरून या राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे. मग हे कसले मजबूत नेते? तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे स्वत:चा बहुमताचा आकडा आहे. तुमच्याबरोबर ४० आमदार घेऊन अजित पवार आहेत. तुमच्याबरोबर शिंदे गटाचे लोक आहेत की नाही हे मला माहिती नाही. ते भविष्यात काय करतील माहिती नाही. बहुमत असताना तुम्ही शपथ घेत नाहीत. राज्याला सरकार देत नाही. राजभवनामध्ये सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. त्यात तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांचे नावे द्यायला तुम्ही तयार नाहीत. राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला? राजभवन तुम्ही चलवताय का?”, असे अनेक सवाल संजय राऊत यांनी महायुतीला केले.
“हे सरकार एका गृहमंत्री पदावरून अडकलेलं नाही. भाजपाने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करत आहेत ना? तर हे एका मिनिटात चिरडून टाकतील. हे सर्व डरपोक लोक आहेत, ईडी आणि सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत. ते स्वबळावर निवडून आलेले नाहीत. ते कसे निवडून आले? हे लोकांना माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यांना जनमताचा पाठिंबा नाही. पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेलं नाही, तर यामागे काही वेगळी कारणं आहेत का? फक्त एक गृहमंत्री पद हा सरकार स्थापनेचा वादाचा विषय असू शकत नाही. या सर्व गोष्टीचा उलगडा व्हायला हवा. अन्यथा आम्ही आमचं बंद पुस्तक उघडू”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
शहर
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
महाराष्ट्र
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
गुन्हा
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


