
Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाले तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. महायुतीमध्ये मंत्रीपदाच्या वाटपावरून सध्या वाद सुरू आहेत. राज्याचे नवे मुंख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पीएम मोदी जो निर्णय घेतील हे मान्य असेल असे सांगितले होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार असल्याची चर्चा होती.
अशामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुंख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झाले आहे. दिल्लीमध्ये गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबतच स्पष्ट संकेत दिले.
केंद्राकडून जरी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मु्ख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा त्यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मग एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का अशी देखील चर्चा सुरू आहे. पण एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदाबाबत ठाम असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
|
|
पक्ष नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पूर्ण पाठिंबा आहेत. मुंबईत तीन नेते जे ठरवतील त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच असावे असे मत अमित शहा यांनी व्यक्त केले. त्याचसोबत पीएम मोदींचे देखील हेच मत आहे असे अमित शहा यांनी बैठकीत सांगितले होते. मुख्यमंत्री पदाचा मुद्दा सुटेल पण आता मंत्रीपद वाटपावरून देखील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून अनेक मतभेद आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित बसून मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरवावा, असे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.
महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ते ५ डिसेंबरला शपथ घेण्याची शक्यता आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतल्या आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. खरं तर हा शपथविधी सोहळा दादरच्या शिवाजीपार्कवर होणार असल्याचे म्हटले जात होते. पण ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरामध्ये गर्दी असणार आहे. याच कारणामुळे शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे. या शपथविधी सोहळ्यादरम्यान कोण-कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्याप निश्चित झाले नाही. तसंच, या समारंभाला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील येतील.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




