
Wayanad landslides linked to warming Arabian Sea : केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेमागे अतिवृष्टी हेच प्राथमिक कारण असल्याचे निरीक्षण भूशास्त्र, पर्यावरण संशोधक, अभ्यासकांनी नोंदवले आहे. सखोल अlभ्यासाअंतीच अन्य कारणे समोर येऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले असून, माळीण येथे झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशीच वायनाड येथे भूस्खलन होण्याचा दुर्दैवी योगायोग घडला.
वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलनाची दुर्घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), लष्कराचे जवान यांच्या मदतीने बचावकार्य करण्यात येत आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे.
|
Pune : धरणांच्या परिसरात रात्रभर संततधार, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला |
इस्रोने तयार केलेल्या ‘लँडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया’नुसार केरळचा समावेश भूस्खलनप्रवण राज्यांमध्ये होतो. भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती आहे. भूस्खलनाच्या घटना प्रामुख्याने माती, खडक, भूविज्ञान आणि उताराची अनुकूल परिस्थिती असलेल्या डोंगराळ भागात घडतात. उतारावरून खडक, दगड, मातीच्या अचानक होणाऱ्या हालचालींना भूस्खलन म्हटले जाते. अतिवृष्टी, भूकंप, बर्फ वितळणे आणि पूर अशी भूस्खलनाची काही नैसर्गिक कारणे आहेत. तसेच उत्खनन, डोंगरफोड, वृक्षतोड अशा मानवी हस्तक्षेपांमुळेही भूस्खलन होऊ शकते.
केरळमध्ये अशा स्वरूपाचे भूस्खल या पूर्वीही झाले आहे. केरळ पश्चिम घाटाच्या दक्षिण भागात आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडून माती वाहून गेल्याने भूस्खलन झाल्याचे प्राथमिक कारण दिसून येते. उतारावरून चिखल वाहून गेल्याने त्याचा फटका मोठ्या परिसराला बसला, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले. पर्यावरण आणि भूगोल अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, की पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीचा थर वाहून जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. केरळमधील दुर्घटनेमध्ये तेच दिसून येते. ही दुर्घटना घडण्यामागे मानवी हस्तक्षेपासारखे काही घटक आहेत का, याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल. केरळमधील भूस्खलनाची दुर्घटना डोंगराळ भागात घडली आहे. त्या भागात जांभा दगड असल्याने त्यातून पाणी झिरपते. पाऊस प्रचंड झाल्यास दगडाखाली असलेला मातीचा भुसभुशीत थर वाहून जाऊ शकतो. वायनाड येथील भूस्खलन अशा प्रकारचे असल्याचे दिसते. ही दुर्घटना आपल्याकडे घडलेल्या तळीये, माळीण येथील दुर्घटनांसारखीच आहे. अन्य घटक कारणीभूत आहेत का, या बाबत सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
शहर
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
महाराष्ट्र
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
गुन्हा
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


