
नवी दिल्ली : ‘देशातील निवडणूक आयोग, न्याय संस्था, ईडी, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांच्या बांधिलकीवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले असून देशात निष्पक्ष निवडणूक व लोकशाही धोक्यात आली आहे,’ अशी भीती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली.
केंद्रीय प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाचे २१० कोटी रुपये गोठविल्याच्या विरोधात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘‘ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांना लढण्याची समान संधी मिळण्याची आवश्यकता असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची खाती गोठविण्यात आली आहेत.
निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी ५६ टक्के देणग्या या केवळ भाजपला मिळालेल्या आहेत. काँग्रेसच्या वाट्याला केवळ ११ टक्के देणग्या आल्या आहेत. याशिवाय भाजपला रोखीमध्ये हजारो कोटी मिळाले. त्यांचा काही हिशेब नाही. वर्तमानपत्रांमध्ये, सोशल मीडियात, न्यूज चॅनेलवर दिसणाऱ्या जाहिरातीतून कोट्यावधी रुपये भाजपला मिळाल्याचे स्पष्ट होते
|
|
.
देशातील स्वायत्त संस्थांनी आता निष्पक्ष भूमिका घेऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक करायच्या असल्यास काँग्रेस पक्षाचे गोठविलेले खाते खुले करावे आणि त्या पैशाचा वापर आम्हाला करू द्यावा.
प्राप्तिकर विभागाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. परंतु तेव्हापर्यंत फार उशीर झालेला असेल, तोपर्यंत निवडणुका संपून जातील, त्यामुळे देशातील स्वायत्त संस्थांना या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा’, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.
देशात लोकशाही हे थोतांडः राहुल गांधी
‘देशातील प्रमुख विरोधी पक्षांवर अन्याय केला जात असताना न्यायपालिका, निवडणूक आयोग, माध्यमे चुप्पी साधून आहे, ही कसली लोकशाही? देशात सध्या लोकशाही म्हणजे एक थोतांड आहे’, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत वार केला. केवळ १४ लाख रुपयांच्या व्यवहारावर प्राप्तीकर विभागाने २१० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
प्राप्तीकर कायद्यामध्ये १० हजारपेक्षा अधिक दंड आकारता येत नसल्याचे स्पष्ट असताना बेकायदेशीरपणे दंड लावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही कृती म्हणजे फौजदारी गुन्हा आहे. हा गुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहर
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
महाराष्ट्र
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- कोल्हापूर: माधुरी हत्तीणीच्या परतीचा मार्ग मोकळा; नांदणी येथील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी समितीला ५ ऑगस्टपर्यंत मुदत
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- कोल्हापुर: भरदिवसा राडा: अतिक्रमण हटवल्याच्या रागातून पाच जणांवर तलवारीने हल्ला, दगडफेकीने परिसरात खळबळ
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला




























Subscribe to my channel




