पुणे: पुण्यातील हायप्रोफाईल क्वीन्स गार्डन परिसरात राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे यांनी आपल्याच पत्नी आणि मुलाला बॅटने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे गंभीर पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
"मी मंत्र्यांचा ओएसडी, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही" मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलमधील संशयास्पद चॅटबद्दल विचारणा केल्यामुळे कारंडे यांनी आपल्या पत्नीवर आणि मध्यस्थी करणाऱ्या मुलावर क्रिकेटच्या बॅटने खुनी हल्ला केला. "मी मंत्र्यांचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही," अशा दर्पोक्ती करत कारंडे यांनी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मारहाणीचे फोटो समोर आले असून, त्यात पीडित पत्नी आणि मुलाच्या अंगावर निळेशार वण दिसून येत आहेत, जे या हल्ल्याची भीषणता दर्शवतात.
मंत्र्यांच्या पंखाखाली गुंडांना अभय?
या घटनेवर संताप व्यक्त करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सत्तेच्या उबेखाली हे लोक इतके माजले आहेत की, स्वतःच्या पोटच्या मुलाला बॅटने फोडून काढताना त्यांचे हात थरथरले नाहीत. आपल्या पत्नीला आणि निष्पाप मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणारा हा नराधम अद्याप मोकाट कसा? मंत्र्यांच्या पंखाखाली बसून अशा गुंडांना अभय दिले जात आहे का?" असा थेट सवाल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांना विचारला आहे.
शक्ती कायदा मोदी सरकारने गुंडाळून ठेवला
पुण्यात आजोबाने नातीवर बलात्कार केल्याच्या आणि कारंडे यांच्या घरगुती हिंसेच्या घटनांचा संदर्भ देत वडेट्टीवार यांनी 'शक्ती कायद्या'ची मागणी पुन्हा लावून धरली आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेला शक्ती कायदा मोदी सरकारने बासनात गुंडाळून ठेवला आहे. राज्यातील लेकींच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणण्याची हिंमत सध्याच्या राज्य सरकारमध्ये नाही," अशी टीका त्यांनी केली. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हकालपट्टीची मागणी
कारंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली केली असतानाही मंत्री सावे यांनी अद्याप त्यांना पदावरून का हटवले नाही? असा प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी कारंडे यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. या घटनेमुळे उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अधिकारांच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




