पुणे: पुण्यातील हायप्रोफाईल क्वीन्स गार्डन परिसरात राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे यांनी आपल्याच पत्नी आणि मुलाला बॅटने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे गंभीर पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
"मी मंत्र्यांचा ओएसडी, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही" मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलमधील संशयास्पद चॅटबद्दल विचारणा केल्यामुळे कारंडे यांनी आपल्या पत्नीवर आणि मध्यस्थी करणाऱ्या मुलावर क्रिकेटच्या बॅटने खुनी हल्ला केला. "मी मंत्र्यांचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही," अशा दर्पोक्ती करत कारंडे यांनी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मारहाणीचे फोटो समोर आले असून, त्यात पीडित पत्नी आणि मुलाच्या अंगावर निळेशार वण दिसून येत आहेत, जे या हल्ल्याची भीषणता दर्शवतात.
मंत्र्यांच्या पंखाखाली गुंडांना अभय?
या घटनेवर संताप व्यक्त करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सत्तेच्या उबेखाली हे लोक इतके माजले आहेत की, स्वतःच्या पोटच्या मुलाला बॅटने फोडून काढताना त्यांचे हात थरथरले नाहीत. आपल्या पत्नीला आणि निष्पाप मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणारा हा नराधम अद्याप मोकाट कसा? मंत्र्यांच्या पंखाखाली बसून अशा गुंडांना अभय दिले जात आहे का?" असा थेट सवाल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांना विचारला आहे.
शक्ती कायदा मोदी सरकारने गुंडाळून ठेवला
पुण्यात आजोबाने नातीवर बलात्कार केल्याच्या आणि कारंडे यांच्या घरगुती हिंसेच्या घटनांचा संदर्भ देत वडेट्टीवार यांनी 'शक्ती कायद्या'ची मागणी पुन्हा लावून धरली आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेला शक्ती कायदा मोदी सरकारने बासनात गुंडाळून ठेवला आहे. राज्यातील लेकींच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणण्याची हिंमत सध्याच्या राज्य सरकारमध्ये नाही," अशी टीका त्यांनी केली. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हकालपट्टीची मागणी
कारंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली केली असतानाही मंत्री सावे यांनी अद्याप त्यांना पदावरून का हटवले नाही? असा प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी कारंडे यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. या घटनेमुळे उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अधिकारांच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




