वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जसं की तुमच्या घराची रचना कशी असावी इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत, इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतात, या वस्तू योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत, याची दिशा जर चुकली तर मग घरात वास्तुदोष निर्माण होतो. जसं की तुळशीचं झाडं हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं असे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्याचा आयुष्यात आपल्याला मोठा फटका बसतो. आयुष्यात अनेक संकटं येतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
जेवणानंतर ताटात पाणी ओतणं – वास्तुशास्त्रानुसार अनेकांना अशी सवय असते की ते जेवणानंतर ताटामध्येच हात धुतात, मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे. तुम्ही ज्या ताटात जेवलात त्याच ताटामध्ये हात धुणं किंवा ताटामध्ये पाणी ओतणं हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. हा अन्नाचा अपमान मानला गेला आहे. यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. अन्न, धान्यामध्ये बरकत राहत नाही. अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
जेवल्यानंतर खरकटी भांडी तशीच ठेवणं – वास्तुशास्त्रानुसार रात्री जेवल्यानंतर सर्व खरकटी भांडी स्वच्छ धुवून मगच झोपावे. जर सकाळपर्यंत खरकटी भांडी तशीच ठेवली आणि ही कृती जर दररोज होत असेल तर अशावेळी घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्यामुळे जेवल्यानंतर रात्री कधीही किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता – जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता असेल, नियमितपणे स्वच्छता होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये घरात वास्तुदोष निर्माण होतो. कारण तुमचा घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. घर जर स्वच्छ असेल तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




