वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जसं की तुमच्या घराची रचना कशी असावी इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत, इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतात, या वस्तू योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत, याची दिशा जर चुकली तर मग घरात वास्तुदोष निर्माण होतो. जसं की तुळशीचं झाडं हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं असे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्याचा आयुष्यात आपल्याला मोठा फटका बसतो. आयुष्यात अनेक संकटं येतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
जेवणानंतर ताटात पाणी ओतणं – वास्तुशास्त्रानुसार अनेकांना अशी सवय असते की ते जेवणानंतर ताटामध्येच हात धुतात, मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे. तुम्ही ज्या ताटात जेवलात त्याच ताटामध्ये हात धुणं किंवा ताटामध्ये पाणी ओतणं हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. हा अन्नाचा अपमान मानला गेला आहे. यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. अन्न, धान्यामध्ये बरकत राहत नाही. अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
जेवल्यानंतर खरकटी भांडी तशीच ठेवणं – वास्तुशास्त्रानुसार रात्री जेवल्यानंतर सर्व खरकटी भांडी स्वच्छ धुवून मगच झोपावे. जर सकाळपर्यंत खरकटी भांडी तशीच ठेवली आणि ही कृती जर दररोज होत असेल तर अशावेळी घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्यामुळे जेवल्यानंतर रात्री कधीही किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता – जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता असेल, नियमितपणे स्वच्छता होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये घरात वास्तुदोष निर्माण होतो. कारण तुमचा घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. घर जर स्वच्छ असेल तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
