
Pune : देशातील निवडणूक प्रक्रियेमध्ये गुप्त मतदान पद्धती असताना मतदान झाल्यानंतर मतदारांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांनी केलेले मतदान जाणून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे बुधवारी मतदानानंतर निदर्शनास आले. त्यामुळे मतदारांच्या माहितीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दूरध्वनीद्वारे मतदारांना संपर्क साधण्यात आला. ‘लोकसत्ता प्रतिनिधी’लाही असा दूरध्वनी आला होता. ध्वनिमुद्रित आवाजाद्वारे मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे सांगून कोणाला मतदान केले, याची माहिती जाणून घेण्यासाठी अमुक क्रमांक दाबा, अशा स्वरूपाचा हा दूरध्वनी होता. दूरध्वनीद्वारे संपर्क साधणारी संस्था शासकीय आहे, की खासगी आहे, याबाबतची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे परस्पर मतदारांना संपर्क साधण्याचा नेमका उद्देश काय, मतदानाची माहिती संकलित करून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न आहे का, का ही माहिती मतदानोत्तर पाहणीसाठी घेतली गेली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळीही अशाच स्वरूपाचे दूरध्वनी मतदारांना करण्यात आले होते. आता विधानसभा निवडणुकीनंतरही हाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच या प्रकारामुळे मतदारांच्या खासगीपणाचा अधिकार, विदा सुरक्षितता याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
|
Alibaug : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी |
आपल्याकडे गुप्त मतदान पद्धत आहे. त्यामुळे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची माहिती मिळवणे बेकायदा ठरते. दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मतदानाची माहिती घेणे, हा पुट्टुस्वामी प्रकरणात खासगीपणाचे आयुष्य जगण्याचा अधिकार जपण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान ठरतो. त्यामुळे मतदारांची आणि मतदानाची माहिती असुरक्षित असल्याचे दिसून येते, असे अॅड. ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.
तर, मतदारांनी कोणाला मतदान केले हे दूरध्वनीद्वारे जाणून घेणे अयोग्य आहे. या संदर्भात नेमका कायदा काय आहे, हे तपासावे लागेल. मात्र, हा प्रकार मतदारांच्या खासगीपणावर अतिक्रमण करणारा, मतदारांच्या विदा सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे दिसते. तसेच यामुळे मतदानाच्या गोपनीयतेलाही बाधा येऊ शकते, असे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी नमूद केले.
मोबाइल क्रमांकाचा प्रचारातही वापर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारप्रक्रियेमध्ये मतदारांना लघुसंदेश पाठवून, ध्वनिमुद्रित दूरध्वनी करून प्रचारही करण्यात आला. तसेच, उमेदवारांकडून मतदान पावतीही लघुसंदेशाद्वारे पाठवण्यात आली होती. त्यामुळे प्रचारासाठी मतदारांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर होत असल्याचेही दिसून आले आहे.
शहर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
- भिवंडी दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणारा TDRF जवान खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जागीच गतप्राण; ठाण्यातील घटनेने हळहळ
महाराष्ट्र
- लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी हंगाम ठरला अत्यंत फायदेशीर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त



























Subscribe to my channel




