
Pune : देशातील निवडणूक प्रक्रियेमध्ये गुप्त मतदान पद्धती असताना मतदान झाल्यानंतर मतदारांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांनी केलेले मतदान जाणून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे बुधवारी मतदानानंतर निदर्शनास आले. त्यामुळे मतदारांच्या माहितीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दूरध्वनीद्वारे मतदारांना संपर्क साधण्यात आला. ‘लोकसत्ता प्रतिनिधी’लाही असा दूरध्वनी आला होता. ध्वनिमुद्रित आवाजाद्वारे मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे सांगून कोणाला मतदान केले, याची माहिती जाणून घेण्यासाठी अमुक क्रमांक दाबा, अशा स्वरूपाचा हा दूरध्वनी होता. दूरध्वनीद्वारे संपर्क साधणारी संस्था शासकीय आहे, की खासगी आहे, याबाबतची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे परस्पर मतदारांना संपर्क साधण्याचा नेमका उद्देश काय, मतदानाची माहिती संकलित करून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न आहे का, का ही माहिती मतदानोत्तर पाहणीसाठी घेतली गेली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळीही अशाच स्वरूपाचे दूरध्वनी मतदारांना करण्यात आले होते. आता विधानसभा निवडणुकीनंतरही हाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच या प्रकारामुळे मतदारांच्या खासगीपणाचा अधिकार, विदा सुरक्षितता याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
|
Alibaug : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी |
आपल्याकडे गुप्त मतदान पद्धत आहे. त्यामुळे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची माहिती मिळवणे बेकायदा ठरते. दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मतदानाची माहिती घेणे, हा पुट्टुस्वामी प्रकरणात खासगीपणाचे आयुष्य जगण्याचा अधिकार जपण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान ठरतो. त्यामुळे मतदारांची आणि मतदानाची माहिती असुरक्षित असल्याचे दिसून येते, असे अॅड. ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.
तर, मतदारांनी कोणाला मतदान केले हे दूरध्वनीद्वारे जाणून घेणे अयोग्य आहे. या संदर्भात नेमका कायदा काय आहे, हे तपासावे लागेल. मात्र, हा प्रकार मतदारांच्या खासगीपणावर अतिक्रमण करणारा, मतदारांच्या विदा सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे दिसते. तसेच यामुळे मतदानाच्या गोपनीयतेलाही बाधा येऊ शकते, असे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी नमूद केले.
मोबाइल क्रमांकाचा प्रचारातही वापर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारप्रक्रियेमध्ये मतदारांना लघुसंदेश पाठवून, ध्वनिमुद्रित दूरध्वनी करून प्रचारही करण्यात आला. तसेच, उमेदवारांकडून मतदान पावतीही लघुसंदेशाद्वारे पाठवण्यात आली होती. त्यामुळे प्रचारासाठी मतदारांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर होत असल्याचेही दिसून आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



