मुंबईकरांसाठी मोठी खूशखबर! स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीएसएमटी ते कर्जत-खोपोलीजरम्यान १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या सुरू, प्रवासी क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ

मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे ट्रेनमध्ये आणि स्थानकांवर नेहमीच प्रचंड गर्दी दिसून येते. या रोजच्या गर्दीमुळे आणि धक्काबुक्कीमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी करण्यासाठी मध्य रेल्वेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कर्जत आणि खोपोली दरम्यान धावणाऱ्या १२ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, १५ ऑगस्टपासून या २२ अतिरिक्त फेऱ्या १५ डब्यांच्या रॅकसह धावण्यास सुरुवात झाली आहे. या बदलामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (Main Line) १५ डब्यांच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वरून थेट ५४ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या २२ पैकी ११ फेऱ्या या सकाळच्या आणि सायंकाळच्या अतिगर्दीच्या वेळेत (Peak Hours) धावणार असल्याने चाकरमान्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. तीन अतिरिक्त डबे वाढल्यामुळे प्रत्येक लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता थेट सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे.

या सुधारित आणि विस्तारित १५ डब्यांच्या लोकल सेवांमुळे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, कर्जत आणि खोपोली या उपनगरीय भागातून मुंबईत ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. गाड्यांची एकूण संख्या (१,८२० फेऱ्या) कायम ठेवून केवळ डब्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे गर्दीच्या वेळेस डब्यांमधील ताण व धक्काबुक्की कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *