
Telangana News : तेलंगणामध्ये २२ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आले. मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे तेलंगणामध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा आणि महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये गुरुवारी झालेला पाऊस हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस असल्याची नोंद झाली आहे.
तेलंगणामध्ये गेल्या ६ दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे सखळ भागामध्ये पाणी साचले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. पूरामुळे रस्ते आणि शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये ८ जणांनी आपला जीव गमावला आहे.
या संततधार पावसामुळे तेलंगणा सरकारने राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना २८ जुलैपर्यंत सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणाच्या शिक्षण मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनी याआधी राज्यातील अतिवृष्टीमुळे सर्व शैक्षणिक संस्थांना २६ आणि २७ जुलै रोजी दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती.
तेलंगणातील हनुमाकोंडा, मुलुगु, जयशंकर भूपालपल्ली, जनगाव, भद्राद्री कोठागुडेम, करीमनगर आणि वारंगल जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणा सरकारने संपूर्ण राज्य प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवले आहे.
मुख्य सचिव शांती कुमारी यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सूचनेनुसार, राज्यातील पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत.' तेलंगणामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात पूरसदृश परिस्थिती कायम आहे. या भागातील 1900 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
तेलंगणामध्ये एका दिवसांत आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ६४९.८ मिमी पाऊस झाला आहे. तेलंगणा स्टेट डेव्हलपमेंट प्लॅनिंग सोसायटीच्या नोंदीनुसार, राज्याच्या इतिहासातील हा सर्वाधिक पाऊस आहे. तेलंगणातील पूर परिस्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




