
रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वहाळामधून वाहून गेल्याने जिल्ह्यातील चौथा बळी पावस येथे गेला. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
कळवंडे (ता. चिपळूण) धरणाचा भराव खचला. जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये, शेतांमध्ये पाणी शिरले. बाव नदी पूल अवजड वाहतुकीसाठी काही काळ बंद केला होता. प्रसिद्ध पीर बाबरशेख दर्ग्यामध्ये पाणी शिरले होते. सायंकाळी मात्र पावसाने थोडी उसंत घेतली होती.
दोन दिवस पावसाचे धूमशान घातले आहे. काल उत्तर रत्नागिरीला झोडपून काढले. चिपळूण, खेड, राजापूरला पूरस्थिती होती. आता या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. रात्रीपासून दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने हाहाकार माजवला. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार पावसाने कहर केला.
आजदेखील जिल्ह्यांत रेड अलर्ट आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झालेले. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा तालुक्यातील काजळी नदी आणि बावनदीला पूर आला. हरचिरी, सोमेश्वर, टेंभ्ये, तोणदे, पोमेंडी आदी भागात पाणी शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळे येथे दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. परंतु, काही काळात दरड बाजूला करून मार्ग मोकळा केला.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप-नवेदरवाडी येथील वाहून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह रोहिदासवाडी वाहळात सापडला. रवींद्र कृष्णा भाटकर असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली होती. कळवंडे (ता. चिपळूण) धरणाचा भराव खचल्याने धरणाला धोका निर्माण झाल्याची भीती होती. परंतु, याबाबत प्रशासनाने खुलासा केला असून, धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.
|
|
पावसाचा जोर कायम असल्याने बावनदी पूल अवजड वाहनांसाठी काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती सरपंच तन्वी कोकजे यांनी ही माहिती दिली. लांजा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला होता. काजळी, मुचकुंदी, बेनी, नावेरी या चारही नद्यांना महापूर आला.
पुरामुळे मठ येथील दत्त मंदिर, पन्हळे पडवण, इंदवटी सुतारवाडी, झर्ये-रिंगणे रस्ते पाण्याखाली गेले. काजळी पुरामुळे आंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली होती. परंतु, पावसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा सुरू करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील नावडी-रामपेट येथेही पुरामुळे घरे पाण्याखाली गेली होती. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.
शहर
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
महाराष्ट्र
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

