
रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वहाळामधून वाहून गेल्याने जिल्ह्यातील चौथा बळी पावस येथे गेला. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
कळवंडे (ता. चिपळूण) धरणाचा भराव खचला. जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये, शेतांमध्ये पाणी शिरले. बाव नदी पूल अवजड वाहतुकीसाठी काही काळ बंद केला होता. प्रसिद्ध पीर बाबरशेख दर्ग्यामध्ये पाणी शिरले होते. सायंकाळी मात्र पावसाने थोडी उसंत घेतली होती.
दोन दिवस पावसाचे धूमशान घातले आहे. काल उत्तर रत्नागिरीला झोडपून काढले. चिपळूण, खेड, राजापूरला पूरस्थिती होती. आता या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. रात्रीपासून दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने हाहाकार माजवला. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार पावसाने कहर केला.
आजदेखील जिल्ह्यांत रेड अलर्ट आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झालेले. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा तालुक्यातील काजळी नदी आणि बावनदीला पूर आला. हरचिरी, सोमेश्वर, टेंभ्ये, तोणदे, पोमेंडी आदी भागात पाणी शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळे येथे दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. परंतु, काही काळात दरड बाजूला करून मार्ग मोकळा केला.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप-नवेदरवाडी येथील वाहून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह रोहिदासवाडी वाहळात सापडला. रवींद्र कृष्णा भाटकर असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली होती. कळवंडे (ता. चिपळूण) धरणाचा भराव खचल्याने धरणाला धोका निर्माण झाल्याची भीती होती. परंतु, याबाबत प्रशासनाने खुलासा केला असून, धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.
|
|
पावसाचा जोर कायम असल्याने बावनदी पूल अवजड वाहनांसाठी काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती सरपंच तन्वी कोकजे यांनी ही माहिती दिली. लांजा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला होता. काजळी, मुचकुंदी, बेनी, नावेरी या चारही नद्यांना महापूर आला.
पुरामुळे मठ येथील दत्त मंदिर, पन्हळे पडवण, इंदवटी सुतारवाडी, झर्ये-रिंगणे रस्ते पाण्याखाली गेले. काजळी पुरामुळे आंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली होती. परंतु, पावसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा सुरू करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील नावडी-रामपेट येथेही पुरामुळे घरे पाण्याखाली गेली होती. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




