
Pune : गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असणारा पुणे ते मुंबईदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न कायम आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणादेखील झाली. परंतु त्याचे काम कधी सुरू होणार असा प्रश्न आहे. या दोन मार्गिका सुरू झाल्यास मार्गावरील गाड्यांची संख्यादेखील वाढवता येईल; तसेच लोकल गाड्यांनादेखील त्याचा फायदा होऊ शकतो. रेल्वे गाड्यांची संख्या वाढवल्यास रस्ते वाहतुकीवरील ताणसुद्धा कमी होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सहा तास रेल्वे गाड्याच नाही
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सकाळच्या प्रमुख रेल्वेगाड्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच उपलब्ध असून, त्यानंतर तब्बल सहा तासांचा खंड पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवस बाहेरून येणाऱ्या गाड्या असल्या, तरी त्या फुल्ल असतात. वाढती प्रवासी संख्या आणि कार्यालयीन ये-जा लक्षात घेता सकाळी साडेनऊनंतर किमान दर तासाला एक गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना व नियमित प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
|
|
एसटी बसलाही प्रचंड गर्दी
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसलादेखील कायम गर्दी असते. व्यवसाय, नोकरी, सरकारी कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी सकाळच्या टप्प्यात सिंहगड एक्सप्रेस (६:०५), डेक्कन क्वीन (७:१५), प्रगती एक्सप्रेस (७:४५) आणि वंदे भारत एक्स्प्रेस (९:२०) या प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत. त्यानंतर पुण्यातून सुटणारी एकही गाडी दुपारी सव्वातीनपर्यंत नाही. बाहेरून येणाऱ्या काही विशेष गाड्या आहेत; पण त्यांना कायम गर्दी असल्यामुळे तिकीट मिळत नाही. दुपारनंतर डेक्कन एक्सप्रेस (३:१५), इंटरसिटी एक्सप्रेस (५:५०) आणि इंद्रायणी एक्सप्रेस (६:३५) या गाड्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून जात असल्या, तरी त्यांच्या वेळा मध्यरात्र किंवा पहाटेच्या असल्याने त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत नाहीत.
पुण्यातून सकाळी साडेनऊ ते सव्वातीन असे सहा तास मुंबईसाठी गाड्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होते. त्यामुळे प्रवाशांना एसटी अथवा खासगी कॅबचाच पर्याय राहतो. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान खासगी व्यवसायिकांची संख्या मोठी असल्याचे दिसते. या गाड्या ‘एक्स्प्रेस वे’वरून धावत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्यादेखील वाढते. त्यामुळे साडेनऊनंतर किमान एक ते दोन तासांनी मुंबईसाठी रेल्वे गाड्यांची आवश्यकता आहे. पुणे-मुंबईदरम्यानचा प्रवास साधारण तीन ते चार तासांचा असून, हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग मानला जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त इंटरसिटी अथवा विशेष गाड्या सुरू करून वेळापत्रकातील दरी भरून काढावी, अशी मागणी होत आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ, वेळेवर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel





1 thought on “Pune–Mumbai Trains : सकाळी साडेनऊ नंतर थेट ट्रेन नाही; पुणे-मुंबई प्रवाशांचे हाल, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम”