
Pune : गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असणारा पुणे ते मुंबईदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न कायम आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणादेखील झाली. परंतु त्याचे काम कधी सुरू होणार असा प्रश्न आहे. या दोन मार्गिका सुरू झाल्यास मार्गावरील गाड्यांची संख्यादेखील वाढवता येईल; तसेच लोकल गाड्यांनादेखील त्याचा फायदा होऊ शकतो. रेल्वे गाड्यांची संख्या वाढवल्यास रस्ते वाहतुकीवरील ताणसुद्धा कमी होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सहा तास रेल्वे गाड्याच नाही
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सकाळच्या प्रमुख रेल्वेगाड्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच उपलब्ध असून, त्यानंतर तब्बल सहा तासांचा खंड पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवस बाहेरून येणाऱ्या गाड्या असल्या, तरी त्या फुल्ल असतात. वाढती प्रवासी संख्या आणि कार्यालयीन ये-जा लक्षात घेता सकाळी साडेनऊनंतर किमान दर तासाला एक गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना व नियमित प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
|
|
एसटी बसलाही प्रचंड गर्दी
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसलादेखील कायम गर्दी असते. व्यवसाय, नोकरी, सरकारी कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी सकाळच्या टप्प्यात सिंहगड एक्सप्रेस (६:०५), डेक्कन क्वीन (७:१५), प्रगती एक्सप्रेस (७:४५) आणि वंदे भारत एक्स्प्रेस (९:२०) या प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत. त्यानंतर पुण्यातून सुटणारी एकही गाडी दुपारी सव्वातीनपर्यंत नाही. बाहेरून येणाऱ्या काही विशेष गाड्या आहेत; पण त्यांना कायम गर्दी असल्यामुळे तिकीट मिळत नाही. दुपारनंतर डेक्कन एक्सप्रेस (३:१५), इंटरसिटी एक्सप्रेस (५:५०) आणि इंद्रायणी एक्सप्रेस (६:३५) या गाड्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून जात असल्या, तरी त्यांच्या वेळा मध्यरात्र किंवा पहाटेच्या असल्याने त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत नाहीत.
पुण्यातून सकाळी साडेनऊ ते सव्वातीन असे सहा तास मुंबईसाठी गाड्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होते. त्यामुळे प्रवाशांना एसटी अथवा खासगी कॅबचाच पर्याय राहतो. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान खासगी व्यवसायिकांची संख्या मोठी असल्याचे दिसते. या गाड्या ‘एक्स्प्रेस वे’वरून धावत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्यादेखील वाढते. त्यामुळे साडेनऊनंतर किमान एक ते दोन तासांनी मुंबईसाठी रेल्वे गाड्यांची आवश्यकता आहे. पुणे-मुंबईदरम्यानचा प्रवास साधारण तीन ते चार तासांचा असून, हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग मानला जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त इंटरसिटी अथवा विशेष गाड्या सुरू करून वेळापत्रकातील दरी भरून काढावी, अशी मागणी होत आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ, वेळेवर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
शहर
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
- एका युगाचा अंत! क्रिकेटच्या मैदानावरून केन विल्यमसनचा 'गुडबाय'; निवृत्तीच्या घोषणेने जगभरातील क्रिकेट चाहते भावूक.
महाराष्ट्र
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
- एका युगाचा अंत! क्रिकेटच्या मैदानावरून केन विल्यमसनचा 'गुडबाय'; निवृत्तीच्या घोषणेने जगभरातील क्रिकेट चाहते भावूक.
गुन्हा
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
देश विदेश
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
- एआयचे 'पाणी' संकट: तुम्ही वापरत असलेले एआय १.३ अब्ज लोकांचे पाणी पिणार? डेटा सेंटर्सविरोधात जगभरात संतापाची लाट!
- भारतीय नौदलाचा थरार! ओमानच्या समुद्रात तेल टँकरमध्ये अडकलेले जिवंत 'मिसाईल' यशस्वीरित्या निकामी; मोठी दुर्घटना टळली!
























Subscribe to my channel




1 thought on “Pune–Mumbai Trains : सकाळी साडेनऊ नंतर थेट ट्रेन नाही; पुणे-मुंबई प्रवाशांचे हाल, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम”