मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसचा मार्ग बदलून येथील बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर स्थलांतरित करण्याबाबतचा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव चांगलाच वादात सापडला आहे. बेस्ट समितीच्या सोमवारच्या बैठकीत या प्रस्तावाला जोरदार विरोध करण्यात आला असून, समितीने हा प्रस्ताव नामंजूर करत प्रशासनाकडे परत पाठविला आहे. हा प्रस्ताव सार्वजनिक वाहतुकीला डावलून खासगी वाहने आणि टॅक्सीचालकांना प्राधान्य देणारा असून सामान्य प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाकडून हा प्रस्ताव समितीसमोर मांडण्यात आला होता. गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात. त्यामुळे येथे वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. या परिसरात सध्या असलेल्या बेस्टच्या बसथांब्यामुळे आणि बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते, असा दावा करत नार्वेकरांनी हा बसथांबा दुसरीकडे हलवण्याची सूचना केली होती.
बेस्टला मिळते चांगले उत्पन्न आणि लाखो प्रवासी
सध्या अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सोमवार ते शनिवार या कालावधीत दररोज सरासरी ४३६ बसफेऱ्या होतात. यातून सुमारे २४ हजार प्रवासी प्रवास करतात, ज्यामुळे बेस्ट उपक्रमाला दररोज १ लाख १७ हजार रुपयांचा महसूल मिळतो. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हे प्रमाण आणखी वाढते. सुट्टीच्या दिवशी एकूण ५९८ बसफेऱ्यांमधून तब्बल २८ हजार प्रवासी प्रवास करतात आणि यातून बेस्टला १ लाख ९८ हजार रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळते.
खासगी वाहतुकीला प्राधान्य कशासाठी? समितीचा सवाल
हा मार्ग आणि बसथांबा इतरत्र हलवण्यास बेस्ट समिती सदस्यांनी तीव्र विरोध केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नितीन नांदगावकर यांनी मत मांडले की, "जर बेस्टचा मार्ग स्थलांतरित केला, तर गेटवे ऑफ इंडिया परिसरात खासगी वाहनांची मनमानी वाढेल. यामुळे सामान्य मुंबईकरांसह पर्यटकांच्या खिशालाही मोठी कात्री बसेल."
तर दुसरीकडे, पक्षाच्या प्रवीणा मोरजकर यांनी धोरणावर बोट ठेवत प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, "एकीकडे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे आणि त्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना आपण बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतुकीला डावलून खासगी वाहनांना प्राधान्य का देत आहोत?"
या सर्व गदारोळानंतर, हा प्रस्ताव सामान्य जनतेला त्रासदायक ठरणारा असल्याचा निष्कर्ष काढत बेस्ट समितीने तो फेटाळून लावला आणि प्रशासनाकडे परत पाठवून दिला.
शहर
- शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती, तर संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली;
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
महाराष्ट्र
- शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती, तर संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली;
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
गुन्हा
- मुंबई: बीकेसीमध्ये धावणार देशातील पहिली 'पॉड टॅक्सी'! स्वप्न की वास्तव? प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह.
- बीड हादरले! तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, फोटो-व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेलिंग; अंबाजोगाई परिसरातील धक्कादायक प्रकार
- पुण्यात थरार! महिलेशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण; दिवेघाटात सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून सुटका.
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
इतर
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
- दैनिक राशिभविष्य ७ जून २०२६: आज कोणत्या राशींवर असेल गणपती बाप्पाची कृपा? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- भंडारा: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुदैवाने बचावले!
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
- वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाइप लांबणीवर; आता डिसेंबर २०२६ मध्ये होणार लोकार्पण!
- नवी दिल्ली: सीबीएसईच्या निकालांच्या पोर्टलवर परदेशातून सायबर हल्ला! केंद्रीय यंत्रणा सतर्क; विद्यार्थ्यांच्या डेटाची सुरक्षा सुरक्षित

























Subscribe to my channel



