मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसचा मार्ग बदलून येथील बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर स्थलांतरित करण्याबाबतचा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव चांगलाच वादात सापडला आहे. बेस्ट समितीच्या सोमवारच्या बैठकीत या प्रस्तावाला जोरदार विरोध करण्यात आला असून, समितीने हा प्रस्ताव नामंजूर करत प्रशासनाकडे परत पाठविला आहे. हा प्रस्ताव सार्वजनिक वाहतुकीला डावलून खासगी वाहने आणि टॅक्सीचालकांना प्राधान्य देणारा असून सामान्य प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाकडून हा प्रस्ताव समितीसमोर मांडण्यात आला होता. गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात. त्यामुळे येथे वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. या परिसरात सध्या असलेल्या बेस्टच्या बसथांब्यामुळे आणि बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते, असा दावा करत नार्वेकरांनी हा बसथांबा दुसरीकडे हलवण्याची सूचना केली होती.
बेस्टला मिळते चांगले उत्पन्न आणि लाखो प्रवासी
सध्या अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सोमवार ते शनिवार या कालावधीत दररोज सरासरी ४३६ बसफेऱ्या होतात. यातून सुमारे २४ हजार प्रवासी प्रवास करतात, ज्यामुळे बेस्ट उपक्रमाला दररोज १ लाख १७ हजार रुपयांचा महसूल मिळतो. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हे प्रमाण आणखी वाढते. सुट्टीच्या दिवशी एकूण ५९८ बसफेऱ्यांमधून तब्बल २८ हजार प्रवासी प्रवास करतात आणि यातून बेस्टला १ लाख ९८ हजार रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळते.
खासगी वाहतुकीला प्राधान्य कशासाठी? समितीचा सवाल
हा मार्ग आणि बसथांबा इतरत्र हलवण्यास बेस्ट समिती सदस्यांनी तीव्र विरोध केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नितीन नांदगावकर यांनी मत मांडले की, "जर बेस्टचा मार्ग स्थलांतरित केला, तर गेटवे ऑफ इंडिया परिसरात खासगी वाहनांची मनमानी वाढेल. यामुळे सामान्य मुंबईकरांसह पर्यटकांच्या खिशालाही मोठी कात्री बसेल."
तर दुसरीकडे, पक्षाच्या प्रवीणा मोरजकर यांनी धोरणावर बोट ठेवत प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, "एकीकडे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे आणि त्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना आपण बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतुकीला डावलून खासगी वाहनांना प्राधान्य का देत आहोत?"
या सर्व गदारोळानंतर, हा प्रस्ताव सामान्य जनतेला त्रासदायक ठरणारा असल्याचा निष्कर्ष काढत बेस्ट समितीने तो फेटाळून लावला आणि प्रशासनाकडे परत पाठवून दिला.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




