
Sangamner Crime : रागाच्याभरात व्यक्ती कधी काय करेल याचा काहीच नेम नसतो. कोणत्याही नात्यात गैरसमज असल्यास ते नातं आणखी बिघडत जातं आणि त्याचा वाईट शेवट होतो. याचीच प्रचिती संगमनेरमध्ये आली आहे. येथे दोन मित्रांनी आपल्या एका मित्राची निर्घृण हत्या केलीये.
शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी आपल्याच मित्राला दारु पाजून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. संगमनेर-लोणी रस्त्यापासून सुमारे तीस फूट आतील मैदानात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या दोन तासांतच दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
|
Sanjay Raut: भारतात सध्या रशिया, चिनी राजकीय पॅटर्न सुरु; राऊतांचा हल्लाबोल |
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी समनापूर शिवारातील एका हॉटेल जवळील मोकळ्या पटांगणात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावर सापडलेल्या बिअरच्या बाटल्या कोठून आणल्या याचा तपास करुन पोलिसांनी अवघ्या तासाभरातच आरोपींची ओळख पटवली. मात्र अटक होण्याच्या भीतीने दोन्ही संशयीत रात्रीपासूनच पसार झाले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आणि पुढील दोन तासातच दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
हत्या करणारे दोन्ही आरोपी आणि मयत एकाच समाजाचे आणि नेहमीसोबत राहणारे होते. शुक्रवारी (22 मार्च ) रात्री त्यांनी वडगाव पान जवळील एका बिअर शॉपीमधून तीन बिअरच्या बाटल्या घेतल्या. तिघांनीही समनापूर शिवारातील एका हॉटेल जवळील मोकळ्या पटांगणात बसून त्या रिकाम्या केल्या.
त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले आणि त्यातून एकाने जवळील चाकू काढून अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत ( वय 22, रा. समनापूर ) याचा धारदार चाकूने गळा चिरुन खून केला. घटनेनंतर दोघेही आरोपी तेथून पसार झाले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेमागे नाजूक कारण असण्याची शक्यता आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून हत्येच्या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




