
Pune : साधू वासवानी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील सततचा विलंब पाहता कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महापालिकेला पत्र पाठवून, कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.
कोरेगाव पार्क–बंडगार्डन परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. दीड वर्ष उलटल्यानंतरही तीन खांबांचे काम प्रलंबित असल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने विलंबामागे तांत्रिक अडचणींचा दाखला देत बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. लष्कर भागाला पाणीपुरवठा करणारी १००० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी आणि त्या ठिकाणी असलेली रेल्वे लाईन ही प्रमुख अडचण ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कामादरम्यान रेल्वे ट्रॅकला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पर्यायी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांत पूल पूर्ण करू, असा दावा त्यांनी केला आहे.
वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
पुलाच्या कामामुळे कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड, बंडगार्डन आणि साधू वासवानी चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. साउथ मेन रोडकडील अंडरपास बंद असल्याने सर्व वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे, परिणामी प्रवासाचा वेळ तिपटीने वाढला आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्यक समन्वय न साधल्यानेच हे प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे.
पोलिस आयुक्तांचे आक्षेप
पोलिस आयुक्तांनी पत्रात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:
- सुरुवातीला नेमलेले वाहतूक वॉर्डन काढून घेतल्याने पोलिसांवर ताण वाढला
- सहा मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही
- कामाचा वेग अत्यंत संथ असून पुढील वर्षभरातही पूर्णत्वाची शक्यता कमी
- विलंबासाठी जबाबदार कंत्राटदारावर तातडीने कारवाई करावी
महापालिकेची भूमिका
महापालिकेनुसार, रेल्वे हद्दीत येणाऱ्या भागासाठी ‘ओपन वेब गर्डर’च्या डिझाइनमध्ये बदल सुचवण्यात आले होते, ज्यास मंजुरी मिळण्यासाठी सुमारे नऊ महिने लागले. तसेच, मुख्य जलवाहिनी स्थलांतरित होईपर्यंत पुढील काम करणे शक्य नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाची अधिकृत मुदत २४ महिने (पावसाळा वगळून) असून मे २०२६पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



