
Delhi :आम आदमी पार्टी (AAP) मध्ये नुकत्याच झालेल्या फेरबदलानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत थेट पक्षालाच सवाल केला आहे.
“माझ्या शांततेचा अर्थ माझा पराभव समजू नका. मला गप्प करण्यात आले आहे, पण मी हरलेलो नाही,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
‘जनतेचे मुद्दे मांडणे हा गुन्हा आहे का?’
राघव चड्ढा यांनी व्हिडिओमध्ये प्रश्न उपस्थित करत म्हटले,
“मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलण्याची संधी मिळते, तेव्हा मी जनतेचे मुद्दे मांडतो. जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का? मी काही पाप केले आहे का?”
त्यांनी आरोप केला की, पक्षाकडूनच संसदेत त्यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला.
‘मी नेहमी सामान्य माणसासाठीच बोललो’
आपल्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, संसदेत त्यांनी अनेक महत्त्वाचे विषय मांडले—
* एअरपोर्टवरील महागाई
* डिलिव्हरी रायडर्सच्या समस्या
* अन्नातील भेसळ
* टोल प्लाझा व बँक चार्जेस
* मध्यमवर्गीयांवरील करांचा बोजा
* टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज धोरणांवरील प्रश्न
“हे सर्व मुद्दे मांडल्यानंतर सामान्य नागरिकाचा फायदा झाला, मग पक्षाचे नुकसान नेमके कुठे झाले?” असा सवालही त्यांनी केला.
‘माझा आवाज का दाबला जातोय?’
राघव चड्ढा यांनी भावनिक स्वरात म्हटले,
“कोणाला मला बोलण्यापासून रोखायचे आहे? माझा आवाज का दाबला जातोय?”
जनतेला उद्देशून त्यांनी समर्थन कायम ठेवण्याचे आवाहनही केले—
“मी तुमच्यामुळे आहे आणि तुमच्यासाठीच आहे. माझा हात सोडू नका.”
‘मी सागर आहे… वेळ आल्यावर वादळ बनेन’
व्हिडिओच्या शेवटी त्यांनी ठाम इशारा देत म्हटले—
“माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी तो सागर आहे, जो वेळ आल्यावर वादळ बनतो.”
AAP मधील मोठा बदल
आम आदमी पार्टी ने राज्यसभेत संघटनात्मक फेरबदल करत राघव चड्ढा यांना उपनेते पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राघव चड्ढा यांचा राजकीय प्रवास
* 2020–2022 : दिल्ली विधानसभेचे आमदार
* दिल्ली जल बोर्डमध्ये सदस्य म्हणून काम
* एप्रिल 2022 : पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड
ही संपूर्ण घडामोड आगामी काळात आम आदमी पार्टी मधील अंतर्गत राजकारणाला नवा वळण देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



