Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादव याने अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, शाहिद कपूर यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करत राजपाल याने बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारली. पण आता अभिनेता भारतातील सर्वांत मोठ्या तुरुंगात आहे. अभिनेता सध्या तिहार तुरुंगात आहे. सांगायचं झालं तर, 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ सिनेमाच्या वादाबाबत अभिनेत्याला कोर्टाने शिक्षा सुनावली होती. सिनेमाचं दिग्दर्शन राजपाल यादव याने केलं होतं. तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि सिनेमाने फक्त 37 लाख रुपयांची कमाई केली.
सिनेमा फ्लॉप झाला. जेवढ्या बजेटमध्ये सिनेमा तयार करण्यात आलेला, तेवढी कमाई देखील सिनेमा करु शकला नाही. अशात उद्योजकाने राजपाल यादव याच्याकडे सतत पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेर हे प्रकरण सत्र दंडाधिकारी न्यायालयात गेले आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं.
मिळालेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये ‘अता पता लापता’ सिनेमासाठी राजपाल याने दिल्ली येथील कंपनी मुरली प्रोडेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5 कोटी रुपये घेतले. या कंपनाचे मालक माधव गोपाळ अग्रवाल आहे. माधव एक उद्योजक आहेत. पैसे मिळत नसल्यामुळे राजपाल यांच्या विरोधाक माधव यांनी तक्रार दाखल केली. तेव्हा माधव यांनी राजपाल याच्याकडून सतत 5 कोटी रुपये मागण्याची सुरुवात केली.
पण एका मुलाखतीत राजपाल याने मोठा खुलासा केला होता, ‘सिनेमा तयार करण्यासाठी मला माधव गोपाल अग्रवार यांनी 5 कोटी रुपये दिले होते. मी ही रक्कम कर्ज म्हणून कधी घेतलीच नव्हती… त्यांनी फायनेंसर म्हणून सिनेमासाठी पैसे लावले होते. कारण त्यांना त्यांच्या नातवाल सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून लॉन्च करण्याचं होतं.’, पण सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर माधव अग्रवाल यांनी राजपाल यांच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि कोर्टाने राजपाल याची दोषी म्हणून घोषणा केली…
2018 मध्ये दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयात पोहोचले. 2019 मध्ये या न्यायालयानेही राजपाल यादवची शिक्षा कायम ठेवली. दरम्यान, राजपाल यादव याच्याकडे असलेल्या पैशांवरील व्याज वाढतच गेले आणि रक्कम 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अनेक वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर राजपाल यादव याने 5 फेब्रुवारी 2026 मध्ये तिहार तुरुंगात सरेंडर केलं. सध्या राजपाल यादव तुरुंगात असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अभिनेत्याच्या मदतीला धावून आले आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




