
Raj Thackeray : मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधीमंडळात एकमतानं मंजूर झालं. यासंदर्भातमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र, याचा कितपत फायदा होईल, याचा विचार मराठा समाजानं करावा, मराठा समाजानं जागरूक राहावं, कारण सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र, मराठा समाजानं जागरूक राहावं, सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल, तर तामिळनाडूत राज्य सरकारनं अशा प्रकराचं आरक्षण दिलं आणि आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचं पुढे काहीच झालं नाही, राज्य सरकारला मुळात असे अधिकार आहेत का? ही गोष्ट आहे केंद्राची, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या निर्णयाची. मी मागेही सांगितलं होतं की, हा विषय टेक्निकल विषय आहे, उगाच सरकारनं जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही."
|
|
सरकारला विचारलं पाहिजे, तुम्ही 10 टक्के दिलं म्हणजे, नेमकं काय दिलं तुम्ही? : राज ठाकरे
सरकारला विचारलं पाहिजे, तुम्ही 10 टक्के दिलं म्हणजे, नेमकं काय दिलं तुम्ही? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का? पुन्हा सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जाणार, त्यानंतर राज्य सरकार सांगणार सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलंय, आम्ही काही करु शकत नाही. म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या, याला काही अर्थ आहे का?, असंही राज ठाकरे म्हणाले आहे.
2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात कायदा लागू करण्यात आला होता, त्याचं काय झालं? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे. उर्वरित 10 टक्क्याचंही तेच होणार ना? राज्य सरकारला मुळात अधिकार आहेत का? या सर्व गोष्टींचे? आज देशात अनेक राज्य आहेत, राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत, त्यांचेही विषय आहेत, असं एखाद्या राज्याबाबत, एखाद्या जातीबाबत असं नाही करता येत, या गोष्टींवर समाजानंही लक्ष देणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज्यासमोर भीषण दुष्काळाचं सावट, याकडे कोणाचं लक्ष नाही : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले की, "मला कळतच नाही नेमकं काय सुरू आहे? दुष्काळाचा विषय इतका मोठा आहे, फेब्रुवारीत आपण आहोत आणि राज्यासमोर भीषण दुष्काळाचं सावट आहे. याकडे कोणाचं लक्ष नाही. निवडणुका, जातीपातीचं राजकारण, आरक्षण याच गोष्टींकडे आपल्या सर्वांचं लक्ष वळवायचं आणि मूळ विषयांकडे दुर्लक्ष करायचं. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर राज्यात काही सुरू आहे का? काहीच नाही..."
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




