
Pune : भारतात पहिल्यांदाच होणार UCI 2.2 मल्टीस्टेज शर्यतीचे आयोजन; अधिकृत चिन्ह आणि शुभंकराचे अनावरण २०२८ साली होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता फेरी म्हणून पुणे ग्रँड टूरला मान्यता पुणे (२९ ऑक्टोबर २०२५): भारताच्या पहिल्या व्यावसायिक प्रो स्टेज एलीट पुरुष सायकलिंग स्पर्धा (UCI 2.2) या आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंटचे अधिकृत चिन्ह आणि शुभंकराचे अनावरण उत्साही नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोबतच “पुणे ग्रँड टूर २०२६” या भारतातील पहिल्या जागतिक पातळीच्या सायकलिंग स्पर्धेची घोषणा करण्यात आली.
पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा २०२८ मध्ये होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता फेरी म्हणून स्विकारली जाणार आहे. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना १९ ते २३ जानेवारी २०१६ दरम्यान आयोजित पाच दिवसीय, अनेक टप्प्यांची शर्यत पूर्ण करून महत्त्वाचे रेस-पॉइंट्स मिळवण्याची संधी मिळणार आहे.
|
Pune : समाविष्ट ३२ गावांतील करआकारणी अडली; व्यावसायिक व अनधिकृत मिळकतींवरून वाद |
या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI), क्रीडा व युवक कल्याण विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे महाराष्ट्रात आणि भारतात सायकलिंग क्रांती घडवण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
UCIच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये ‘एलीट इव्हेंट’ म्हणून वर्गीकृत असलेली पुणे ग्रँड टूर ही भारतासाठी जागतिक क्रीडा मंचावर सहभागी होण्याची ऐतिहासिक घटना आहे. ४३७ किमीच्या मार्गावर आधारित ही स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या शहरी भाग, डोंगराळ परिसर आणि ग्रामीण रस्त्यांचा संगम दाखवणारा एक भव्य अनुभव आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारतातील पहिल्या ‘UCI 2.2’ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन पुण्यात होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. पुणे ग्रँड टूर हे महाराष्ट्राच्या क्रीडा दृष्टिकोणाचे प्रतीक आहे. आमचा उद्देश क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे आणि सायकलिंगसारख्या खेळांना नवसंजीवनी देणे आहे. या उपक्रमातून भारतातील तरुण सायकलपटूंना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या नव्या राष्ट्रीय सायकलपटूंची निर्मिती होईल.”
या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सायकलिंग हा केवळ एक खेळ नाही. ती एक जागतिक चळवळ आहे. मात्र भारत अद्याप या जागतिक समुदायाचा भाग झालेला नाही. त्यामुळे आजचा दिवस केवळ पुण्यासाठीच नाही तर महाराष्ट्र आणि भारतासाठीही ऐतिहासिक आहे. आज आपण जगातील सायकलिंग समुदायात सामील होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.”भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आपल्या क्रीडा क्षमतेचे दर्शन घडवण्याची ही योग्य वेळ आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रँड टूरचे प्रभारी जितेंद्र डुडी म्हणाले, “पुणे ग्रँड टूरमुळे भारत जागतिक सायकलिंग मंचावर एक धाडसी पाऊल टाकत आहे. भारतातील तरुणांना व्यावसायिक सायकलिंगकडे वळवणे आणि या देशात सायकलिंगला नव्या पातळीवर नेणे हा आमचा उद्देश आहे. आम्हाला अशी परंपरा निर्माण करायची आहे की सायकलिंगकडे केवळ विरंगुळा म्हणून नाही, तर जागतिक क्रीडा उत्कृष्टतेचा मार्ग म्हणून पाहिले जावे.”
सायकलिंगविषयी देशातील वाढता उत्साह आणि भारताची दीर्घकालीन क्रीडा परंपरा पाहता जगातील सर्वोत्तम सायकलिंग स्पर्धांमध्ये स्थान मिळवण्याचे पुणे ग्रँड टूरचे उद्दिष्ट आहे. ही स्पर्धा भारतीय सायकलिंग क्षेत्रातील परिवर्तनाचा द्योतक ठरणार आहे ज्याचा लाभ केवळ व्यावसायिक खेळाडूंनाच नव्हे, तर प्रेक्षकांनाही मिळणार आहे.
पुणे ग्रँड टूरच्या आगमनासोबत भारत सायकलिगंमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहे. सायकलिंग संस्कृती निर्माण करण्याच्या तसेच या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या आणि नवी उमेद निर्माण करण्याच्या दिशेने हे टाकलेले हे एक पाऊल आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




