
Pune : शहरी गरीब योजनेंतर्गत पूना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आठ तासांनी मृतदेह ताब्यात दिल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नातेवाइकांनी तक्रार केली आहे. पूना हॉस्पिटलमध्ये महेश पाठक (वय ५३, शुक्रवार पेठ) उपचार घेत होते. त्यांचा २५ एप्रिलला रात्री १.३० वाजता मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना देयक (बिल) विभागात पाठविण्यात आले. ‘रुग्णावर शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार सुरू असल्याने त्यांचा मृतदेह सकाळी ८.३० वाजता नेता येईल, असे देयक विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले. ‘आत्ता देयक तयार करण्यास कोणी नसते, तुम्ही सकाळी या,’ असे सागंण्यात आले,’ असे रुग्णाचे नातेवाइक व अग्निशामक विभागाचे अधिकारी नीलेश महाजन यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
‘सकाळी ८.२० वाजता नातेवाइक रुग्णालयात गेले. त्यानंतर ८.४५ वाजता देयक विभागातील कर्मचारी आले. ‘वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत, ९.३० वाजेपर्यंत थांबावे लागेल,’ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. नातेवाइकांनी रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना भेटू देण्याची विनंती केली. मात्र, दोन्ही अधिकारी १० वाजता येतात, असे सांगण्यात आले. अखेर सकाळी ९.३० वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याचबरोबर देयक विभागाने ७ हजार रुपयांची परताव्याची रक्कम द्यायची आहे, असेही नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे केवळ देयकावर प्रक्रिया करण्यासाठी मृतदेह आठ तास रोखून ठेवण्यात आल्याने रुग्णालयावर कारवाई करावी,’ असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
|
|
या प्रकाराबाबत पूना हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी रेणू कटारे म्हणाल्या, ‘या रुग्णाचा मृत्यू रात्री १.३० वाजता झाला. सर्वसाधारणपणे रात्री उशिरा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइक मृतदेह सकाळीच नेतात. त्यामुळे रुग्णालयातील देयक विभाग रात्री सुरू नसतो. रुग्णालयात रात्रीच्या वेळी आपत्कालीन विभागातील कर्मचारी अंदाजे देयक करतात. त्यांनी अंदाजे देयकाची रक्कम नातेवाइकांना सांगितली. ती भरून नातेवाईक मृतदेह घरी घेऊन जाऊ शकले असते. मात्र, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये योग्य संवाद न झाल्याने हा प्रकार घडला.’
रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने याप्रकरणी चौकशी केली जाईल. सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाईल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



