
Pune : दिवाळीनिमित्त मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेलांसह इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. यंदा या मोहिमेला खीळ बसली आहे. विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचा फटका या मोहिमेला बसत आहे.
नागरिकांना सकस, भेसळमुक्त व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर असते. दिवाळीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे दिवाळीनिमित्त मिठाई, मावा उत्पादक व वितरकांनी ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाईची विक्री करावी. अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विभागाकडून मोहीम हाती घेण्यात येते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी भेसळ रोखणारी मोहीम राबविण्यात विभागाला अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.
यंदा विधानसभा निवडणुकीमुळे विभागातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून भेसळ रोखण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी दोन्ही कामे असे करणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
|
Pandhapur : काॅंग्रेस, शिंदे गट विरोधात धनगर समाज आक्रमक; भंडारा उधळून केला निषेध |
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी अन्नपदार्थाच्या वेष्टनावरील बॅच क्रमांक, लॉट क्रमांक, पदार्थ वापरण्याची मुदत, उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक आदी तपासूनच तो खरेदी करावा. अन्नपदार्थावर अशी माहिती नसल्यास त्याची खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. मिठाई ताजी व सकस आहे याची खात्री करावी. याचबरोबर अन्नपदार्थ खरेदी करताना विक्रेत्याकडून देयक घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही. कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ येथे तक्रार नोंदवावी.
उत्पादकांनी याचे पालन करावे…
- अन्नपदार्थ तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
- पदार्थ बनविण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
- परवानाधारक व्यावसायिकांकडून कच्चा माल खरेदी करावा.
- पदार्थ बनविण्याची भांडी स्वच्छ व झाकणबंद असावीत.
- अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित ठिकाणी जाळीदार झाकणाने झाकूण ठेवावेत.
- कामगारांना त्वचा व संसर्गजन्य आजार झालेला नसावा.
- कामगारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी
- खाद्यतेलाचा तळण्यासाठी पुनर्वापर करू नये.
अन्न व औषध प्रशासनाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. यामुळे त्यांनी आपली निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून दिवाळीच्या काळात राबविण्यात येणारी भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट



























Subscribe to my channel




