
Pune : बालेवाडी परिसरात गेल्या महिन्याभरापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून हे पाणी वापरल्याशिवाय इतर दुसरा पर्याय नागरिकांसमोर नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. बालेवाडी गावठाण, पाटील वस्ती, अष्टविनायक चौक व या भागातील परफेक्ट टेन, ओर्वी, मधुबन, गिनी विवियाना, पारितोषिक व मधुबन अशा अनेक सोसायट्यांसह मुंबई- बंगळूर महामार्गजवळील सरोवर हॉटेल परिसरामध्ये अनेक दिवसापासून नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
दूषित पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे, यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच वापरण्याच्या पाण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने हेच दूषित पाणी वापरावे लागत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना पोटाचे विकार होत असून वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे याबाबत तक्रार नोंदविली असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
|
|
येथील रहिवासी गणेश बालवडकर म्हणाले, "सध्या पावसाळ्याचे दिवस असून डासांमुळे अनेक आजार पसरत आहेत. अशातच आता दूषित पाण्याच्या वापरामुळे लोक आजारी पडत आहेत. प्रशासनाने यावर उपाययोजना त्वरित कराव्यात." संदीप बालवडकर म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपूर्वीही या भागात दूषित पाणी येऊन अनेक लोक आजारी पडत होते. आता पुन्हा हा प्रश्न उदः भवला आहे, यावर उपाययोजना म्हणून जलवाहिनी साडपाण्याच्या चेंबरपासून हलवून दुसरीकडे टाकण्यात यावी.
याठिकाणी पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा दांडा गेल्या दीड वर्षापासून तुटला असून येथे लाकडी खुटी बसवली आहे. ही प्रशासनाची काम करण्याची कोणती पद्धत आहे? यामुळेच अनेक दिवसांपासून आम्हाला दुषित पाणी प्यावे लागत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळू चालवला आहे.
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाला याबद्दल कल्पना दिली असून येथे सांडपाण्याचे चेंबर तुबल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा झाले आहे. हे पाणी काढल्याशिवाय नेमकी वाहिनीची कुठे गळती झाली आहे हे समजणार नाही. याठिकाणी व्हॉल्व्हचा तुटलेला दांडा बसविण्याचे काम त्वरित करून हा प्रश्न सोडविला जाईल.
- प्रदीप रंगदळे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
जलवाहिनीत मिसळतेय सांडपाणी
बालेवाडी येथे नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने व्हॉल्क बसविले आहेत. त्यापैकी एक व्हॉल्व अष्टविनायक चौक येथे असून या व्हॉल्व्हच्या बाजूलाच सांडपाणी वाहिनीचे चेंबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे चेंबर तुंबले असून सांडपाणी वाहत आहे. येथे पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा दांडा मोडला असून याठिकाणी लाकडी खुटी ठोकून काम चालवले जात आहे. यामुळे हा व्हॉल्व्ह सुरू केला असता त्याद्वारे हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जात आहे.
शहर
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
महाराष्ट्र
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




