
Pune : बालेवाडी परिसरात गेल्या महिन्याभरापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून हे पाणी वापरल्याशिवाय इतर दुसरा पर्याय नागरिकांसमोर नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. बालेवाडी गावठाण, पाटील वस्ती, अष्टविनायक चौक व या भागातील परफेक्ट टेन, ओर्वी, मधुबन, गिनी विवियाना, पारितोषिक व मधुबन अशा अनेक सोसायट्यांसह मुंबई- बंगळूर महामार्गजवळील सरोवर हॉटेल परिसरामध्ये अनेक दिवसापासून नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
दूषित पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे, यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच वापरण्याच्या पाण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने हेच दूषित पाणी वापरावे लागत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना पोटाचे विकार होत असून वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे याबाबत तक्रार नोंदविली असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
|
|
येथील रहिवासी गणेश बालवडकर म्हणाले, "सध्या पावसाळ्याचे दिवस असून डासांमुळे अनेक आजार पसरत आहेत. अशातच आता दूषित पाण्याच्या वापरामुळे लोक आजारी पडत आहेत. प्रशासनाने यावर उपाययोजना त्वरित कराव्यात." संदीप बालवडकर म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपूर्वीही या भागात दूषित पाणी येऊन अनेक लोक आजारी पडत होते. आता पुन्हा हा प्रश्न उदः भवला आहे, यावर उपाययोजना म्हणून जलवाहिनी साडपाण्याच्या चेंबरपासून हलवून दुसरीकडे टाकण्यात यावी.
याठिकाणी पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा दांडा गेल्या दीड वर्षापासून तुटला असून येथे लाकडी खुटी बसवली आहे. ही प्रशासनाची काम करण्याची कोणती पद्धत आहे? यामुळेच अनेक दिवसांपासून आम्हाला दुषित पाणी प्यावे लागत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळू चालवला आहे.
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाला याबद्दल कल्पना दिली असून येथे सांडपाण्याचे चेंबर तुबल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा झाले आहे. हे पाणी काढल्याशिवाय नेमकी वाहिनीची कुठे गळती झाली आहे हे समजणार नाही. याठिकाणी व्हॉल्व्हचा तुटलेला दांडा बसविण्याचे काम त्वरित करून हा प्रश्न सोडविला जाईल.
- प्रदीप रंगदळे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
जलवाहिनीत मिसळतेय सांडपाणी
बालेवाडी येथे नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने व्हॉल्क बसविले आहेत. त्यापैकी एक व्हॉल्व अष्टविनायक चौक येथे असून या व्हॉल्व्हच्या बाजूलाच सांडपाणी वाहिनीचे चेंबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे चेंबर तुंबले असून सांडपाणी वाहत आहे. येथे पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा दांडा मोडला असून याठिकाणी लाकडी खुटी ठोकून काम चालवले जात आहे. यामुळे हा व्हॉल्व्ह सुरू केला असता त्याद्वारे हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जात आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




