
Pune : महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीची लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी झाली. यामध्ये शरद पवारांच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला.
लोकसभेला मिळालेल्या यशामुळे विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मधून शरद पवार कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात ते आठ वेळा निवडणूक लढवून विजयी झाल्याने आता इच्छा राहिली नाही, असे वक्तव्य करत जोरदार खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचे धाकटे पुत्र जय पवार हे बारामतीतून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या मतदार संघातून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. भावी आमदार म्हणून त्यांचे फ्लेक्स या मतदार संघात लागले आहेत. त्यातच आता बारामती लोकसभेच्या खासदार आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. बारामती मधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का असा प्रश्न खासदार सुळे यांना विचारण्यात आला होता.
|
Mumbai : गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते? |
यावर उत्तर देताना सुळे म्हणाल्या, विधानसभेसाठी अद्याप जागा निश्चित झालेल्या नाहीत. या बाबत लोकांच्या भावना विचारात घेत निर्णय घेतला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे. कुटुंबातील नागरिकांना हार्दिक अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळावी यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीचा विविध भागात दौरे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राचा कारभार दिल्लीतून
राज्यात महिलांवर होणारे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महिला अत्याचाराबाबत हे सरकार असंवेदनशील आहे. राज्यात विविध भागात महिलांवर अत्याचाराचा प्रकार घडत असताना राज्याचे गृहमंत्री बहुतांश वेळा दिल्लीतच असतात. महाराष्ट्राचा कारभार हा दिल्लीतूनच चालविला जात असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



