
New Delhi Railway Station Stampede : एक छोटी चूक अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरू शकते, याचं उदाहरण म्हणजे शनिवारी रात्री दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना होय. महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जमलेल्या भाविकांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १४ महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. या दुर्घटनेत १० गंभीर जखमी आहेत, त्याशिवाय अनेकांना दुखापत झाली आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री दहा वाजता ही दुर्घटना झाली. किंकाळ्या, आराडाओरड, अन् धावपळ यामुळे १८ जणांचा जीव गेलाय. रेल्वेचं ढिसाळ नियोजन अन् अतिरिक्त दिलेली तिकिटे यामुळे ही दुर्घटना झाल्याचे समोर आलेय.
महाकुंभला जाणाऱ्या दोन ट्रेन उशीरा आल्या, त्यात ४०० जागांसाठी रेल्वेकडून १५०० तिकिटांची विक्री करण्यात आली. त्याशिवाय रेल्वे स्टेशनवर गर्दीवर नियंत्रणासाठी कुणीही नव्हते, परिणामी चेंगराचेंगरीची घटना घडली अन् १८ जणांचा जीव गेला. १० जण गंभीर जखमी आहेत. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर रात्री १० ते ११ वाजेदरम्यान दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मदतीची घोषणा कऱण्यात आली आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, रेल्वे मंत्री अन् राष्ट्रपती यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आलेय.
|
|
सुरक्षित समजलेल्या जाणाऱ्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी हजारो लोक कसे जमले? गर्दी नियंत्रणात का आली नाही? रेल्वेने काय चुका केल्या? वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही यंत्रणा नव्हती का? १८ जणांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? यासारखे प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या वक्तव्यानंतर या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे दिसतेय.
महाकुंभासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून दोन स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. शनिवारी सुट्टीचा दिवस, त्यामुळे महाकुंभात जाण्यासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली. महाकुंभात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दीचा उच्चांक गाठला होता, शेकडो लोक जनरल तिकिटांसाठी जमले होते. प्लॅटफॉर्म १४ आणि १५ वर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पण दोन्ही ट्रेन उशीरा आल्या.
कोणत्याही ट्रेनमध्ये जवळपास चार जनरल बोगी असतात. दोन बोगी ट्रेनच्या इंजिनकडे तर दोन बोगी मागील बाजूला असतात. प्रत्येक बोगीमध्ये जवळपास १०० सीट असतात. जनरल बोगीमधून फक्त बसून प्रवास केला जातो. जनरल बोगीमधून मोजक्याच जागा उपलब्ध होत्या. मात्र रेल्वेकडून जनरलची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली केली. प्रत्येक तासाला जवळपास १५०० तिकिटांची विक्री करण्यात आली. म्हणजे ४०० जागांसाठी शेकडो तिकिटांची विक्री करण्यात आली. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धावधाव झाली. रेल्वेकडून गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती. रेल्वे विभागाला स्थानकावरील गर्दीचा अंदाज आलाच नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वंतत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस या दोन्ही उशीरा धावत होत्या. त्यामुळे त्या ट्रेनमध्ये जाणारे लोक प्लॅट फॉर्म १२ अन् १३ वर उभे होते. प्लॅटफॉर्म अन् जिन्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. रात्री ९.३० वाजता प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर पोहचली, ट्रेनमध्ये चढण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की श्वास घ्यायलाही जागा नव्हते. धक्काबुक्की अन् आरडाओरड यातच चेंगराचेंगरी झाली. धक्कादायक म्हणजे ही दुर्घटना घडत होती, त्यावेळी सुरक्षा रक्षक , आरपीएफ अथवा रेल्वेचे कोणतेही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा रेल्वेला अंदाज आला नव्हता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली.
दिल्ली रेल्वे स्टेशनवर रात्री चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी लोकांना श्वास घ्यायलाही जागा नव्हती. लोक अंगावर पाय ठेवून धावत होते. जिन्यावर गर्दी, प्लॅटफॉर्मवर गर्दी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेत जागा मिळवण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलिस आणि फायर ब्रिगेडची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा जीव गेला, त्याशिवाय अनेकजण जखमी आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीत मृत झालेल्याच्या कुटुंबियाला १० लाख, गंभीर जखमी असणाऱ्याला २.५ लाख, जखमी असणाऱ्यांना एक लाख रूपयांच्या मदतीची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




