
New Delhi Railway Station Stampede : एक छोटी चूक अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरू शकते, याचं उदाहरण म्हणजे शनिवारी रात्री दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना होय. महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जमलेल्या भाविकांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १४ महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. या दुर्घटनेत १० गंभीर जखमी आहेत, त्याशिवाय अनेकांना दुखापत झाली आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री दहा वाजता ही दुर्घटना झाली. किंकाळ्या, आराडाओरड, अन् धावपळ यामुळे १८ जणांचा जीव गेलाय. रेल्वेचं ढिसाळ नियोजन अन् अतिरिक्त दिलेली तिकिटे यामुळे ही दुर्घटना झाल्याचे समोर आलेय.
महाकुंभला जाणाऱ्या दोन ट्रेन उशीरा आल्या, त्यात ४०० जागांसाठी रेल्वेकडून १५०० तिकिटांची विक्री करण्यात आली. त्याशिवाय रेल्वे स्टेशनवर गर्दीवर नियंत्रणासाठी कुणीही नव्हते, परिणामी चेंगराचेंगरीची घटना घडली अन् १८ जणांचा जीव गेला. १० जण गंभीर जखमी आहेत. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर रात्री १० ते ११ वाजेदरम्यान दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मदतीची घोषणा कऱण्यात आली आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, रेल्वे मंत्री अन् राष्ट्रपती यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आलेय.
|
|
सुरक्षित समजलेल्या जाणाऱ्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी हजारो लोक कसे जमले? गर्दी नियंत्रणात का आली नाही? रेल्वेने काय चुका केल्या? वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही यंत्रणा नव्हती का? १८ जणांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? यासारखे प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या वक्तव्यानंतर या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे दिसतेय.
महाकुंभासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून दोन स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. शनिवारी सुट्टीचा दिवस, त्यामुळे महाकुंभात जाण्यासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली. महाकुंभात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दीचा उच्चांक गाठला होता, शेकडो लोक जनरल तिकिटांसाठी जमले होते. प्लॅटफॉर्म १४ आणि १५ वर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पण दोन्ही ट्रेन उशीरा आल्या.
कोणत्याही ट्रेनमध्ये जवळपास चार जनरल बोगी असतात. दोन बोगी ट्रेनच्या इंजिनकडे तर दोन बोगी मागील बाजूला असतात. प्रत्येक बोगीमध्ये जवळपास १०० सीट असतात. जनरल बोगीमधून फक्त बसून प्रवास केला जातो. जनरल बोगीमधून मोजक्याच जागा उपलब्ध होत्या. मात्र रेल्वेकडून जनरलची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली केली. प्रत्येक तासाला जवळपास १५०० तिकिटांची विक्री करण्यात आली. म्हणजे ४०० जागांसाठी शेकडो तिकिटांची विक्री करण्यात आली. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धावधाव झाली. रेल्वेकडून गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती. रेल्वे विभागाला स्थानकावरील गर्दीचा अंदाज आलाच नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वंतत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस या दोन्ही उशीरा धावत होत्या. त्यामुळे त्या ट्रेनमध्ये जाणारे लोक प्लॅट फॉर्म १२ अन् १३ वर उभे होते. प्लॅटफॉर्म अन् जिन्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. रात्री ९.३० वाजता प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर पोहचली, ट्रेनमध्ये चढण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की श्वास घ्यायलाही जागा नव्हते. धक्काबुक्की अन् आरडाओरड यातच चेंगराचेंगरी झाली. धक्कादायक म्हणजे ही दुर्घटना घडत होती, त्यावेळी सुरक्षा रक्षक , आरपीएफ अथवा रेल्वेचे कोणतेही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा रेल्वेला अंदाज आला नव्हता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली.
दिल्ली रेल्वे स्टेशनवर रात्री चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी लोकांना श्वास घ्यायलाही जागा नव्हती. लोक अंगावर पाय ठेवून धावत होते. जिन्यावर गर्दी, प्लॅटफॉर्मवर गर्दी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेत जागा मिळवण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलिस आणि फायर ब्रिगेडची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा जीव गेला, त्याशिवाय अनेकजण जखमी आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीत मृत झालेल्याच्या कुटुंबियाला १० लाख, गंभीर जखमी असणाऱ्याला २.५ लाख, जखमी असणाऱ्यांना एक लाख रूपयांच्या मदतीची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
महाराष्ट्र
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे

























Subscribe to my channel




