नवी मुंबई: नेरुळ परिसरात पावसाच्या साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने दोन विद्यार्थिनींना विजेचा जोरदार धक्का बसल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१ जुलै) दुपारी घडली. एल.पी. ब्रिज परिसरातून पायी जात असताना दोघी पाण्यातून चालत होत्या. त्याचवेळी पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने त्यांन जोरदार शॉक बसला आणि त्या रस्त्यावरच कोसळल्या. सुदैवाने वाहतूक पोलिस आणि एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखत दोघींना सुरक्षित बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
प्राथमिक तपासात पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरण्यामागे भूमिगत वीज केबल किंवा शॉर्टसर्किट कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .घटनास्थळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEB/MSEDCL), महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून विद्युतपुरवठा आणि संबंधित यंत्रणेची तपासणी सुरू केली.
या घटनेनंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी विद्युत यंत्रणेची तपासणी आणि देखभाल योग्य प्रकारे झाली का, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उघड्या किंवा धोकादायक विद्युत तारा, दोषपूर्ण उपकरणे आणि भूमिगत केबल्सची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर महापालिका आणि MSEB यांच्यात जबाबदारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महापालिकेने विद्युत वितरण यंत्रणेकडे बोट दाखवले, तर MSEDCL ने संबंधित वीजजोडणी महापालिकेच्या स्ट्रीटलाईट यंत्रणेशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी जबाबदारी कोणाची हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सध्या दोन्ही विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे पावसाळ्यात पाणी साचलेल्या ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, उघड्या किंवा संशयास्पद विद्युत तारा दिसल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा


























Subscribe to my channel



