
Mumbai : मुंबईतून आताची सर्वात मोठी घटना समोर येत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे (Taxiway) वर घडली. विशेष म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना यामुळे टळल्याचं आता बोललं जात आहे. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेमुळे हादरला आहे. त्यानंतर आज रात्री मुंबई विमानतळावर अनपेक्षित घटना घडली. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि इंडिगोच्या या दोन विमान कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले आहेत. या दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते. एअर इंडियाचे AI 2732 हे विमान मुंबईहून कोइम्बतूरच्या दिशेला जाणार होतं. ते धावपट्टीवर थांबलं होतं. तर इंडिगोचं 6E 791 हे विमान हैदराबादहून मुंबई विमातळावर लँडिंग केल्यानंतर टॅक्सी-वेवरून पार्क होण्यासाठी जात होतं. याच दरम्यान ही दोन्ही विमाने टॅक्सी-वेवर असताना त्यांच्या पंखांची टोके एकमेकांना घासली गेली. दोन्ही विमानांचे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती आहे.
|
|
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. "मुंबईहून कोइम्बतूरला जाणाऱ्या AI 2732 या विमानाला उशीर झाला. हे विमान उड्डाणापूर्वी टॅक्सी-वेवर (धावपट्टीकडे जाताना) थांबलेले असताना, या विमानाचा दुसऱ्या एका विमान कंपनीच्या विमानाशी स्पर्श झाला. या दोन्ही विमानांच्या पंखांची टोके एकमेकांना घासल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंडेड (तूर्तास सेवेतून बाहेर) करण्यात आले आहे", अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.
"सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. आमचे पथक प्रवाशांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहे. या घटनेची रीतसर माहिती विमान वाहतूक नियामक संस्थेला देण्यात आली आहे", अशीदेखील माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, DGCA ने दोन्ही कंपन्यांना घटनेचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
शहर
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
महाराष्ट्र
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel





1 thought on “Mumbai : मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि IndiGo विमानांच्या पंखांची धडक; मोठा अपघात टळला”