
Mumbai : मुंबईतून आताची सर्वात मोठी घटना समोर येत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे (Taxiway) वर घडली. विशेष म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना यामुळे टळल्याचं आता बोललं जात आहे. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेमुळे हादरला आहे. त्यानंतर आज रात्री मुंबई विमानतळावर अनपेक्षित घटना घडली. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि इंडिगोच्या या दोन विमान कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले आहेत. या दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते. एअर इंडियाचे AI 2732 हे विमान मुंबईहून कोइम्बतूरच्या दिशेला जाणार होतं. ते धावपट्टीवर थांबलं होतं. तर इंडिगोचं 6E 791 हे विमान हैदराबादहून मुंबई विमातळावर लँडिंग केल्यानंतर टॅक्सी-वेवरून पार्क होण्यासाठी जात होतं. याच दरम्यान ही दोन्ही विमाने टॅक्सी-वेवर असताना त्यांच्या पंखांची टोके एकमेकांना घासली गेली. दोन्ही विमानांचे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती आहे.
|
|
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. "मुंबईहून कोइम्बतूरला जाणाऱ्या AI 2732 या विमानाला उशीर झाला. हे विमान उड्डाणापूर्वी टॅक्सी-वेवर (धावपट्टीकडे जाताना) थांबलेले असताना, या विमानाचा दुसऱ्या एका विमान कंपनीच्या विमानाशी स्पर्श झाला. या दोन्ही विमानांच्या पंखांची टोके एकमेकांना घासल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंडेड (तूर्तास सेवेतून बाहेर) करण्यात आले आहे", अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.
"सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. आमचे पथक प्रवाशांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहे. या घटनेची रीतसर माहिती विमान वाहतूक नियामक संस्थेला देण्यात आली आहे", अशीदेखील माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, DGCA ने दोन्ही कंपन्यांना घटनेचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel




1 thought on “Mumbai : मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि IndiGo विमानांच्या पंखांची धडक; मोठा अपघात टळला”