
Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने तत्कालीन शिवसेनेच्या विरोधात केलेल्या ऐतिहासिक बंडाने भल्याभल्यांचे धाबे दणाणले होते. तत्कालीन शिवसेनेच्या १८ पैकी तब्बल १३ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाची वाट धरली होती. आत्तापर्यंत तब्बल तीन विद्यमान खासदारांना शिंदे यांनी घरचा रस्ता दाखवला आहे.
यातील हिंगोली, यवतमाळ - वाशिम विद्यमान खासदारांना पक्षांतर्गत संघर्ष व भाजपचा स्थानिक पातळीवरील विरोध व भाजपने केलेले सर्वेक्षण अडचणीचे ठरल्याची माहिती मिळत आहे. मात्र या निर्णयाचा फटका शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
|
IPL 2024: पंजाब किंग्सचा रचला इतिहास, आजपर्यंत जगातील कोणत्याच संघाला न जमलेला केला पराक्रम |
यवतमाळ - वाशीमवर गेली २५ वर्षे ठाण मांडून बसलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला. उमेदवारी का नाकारली गेली, याचा आढावा घेतला असता मतदारसंघातील चार भाजप आमदारांचा गवळी यांना विरोध असल्याचे समोर आले.
त्यातच भाजपचे आमदार मदन येरावार यांनी आणलेल्या ३५० कोटींच्या अमृत योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्याने गवळी यांनी संसदेत आवाज उठवला होता. त्याचाच राग मनात धरून योग्यवेळी भाजप आमदारांनी गवळींच्या उमेदवारीवर टाच आणण्याचे प्रयत्न केले.
त्याचबरोबर भावना गवळी यांचे पक्षातील सहकारी मंत्री संजय राठोड यांच्याबरोबरही यवतमाळच्या नेतृत्वावरून वाद असल्याने उमेदवारी न मिळण्यात राठोड यांचीही आडकाठी होती, असे समजते. शिंदे गटाचा अंतर्गत वाद, भाजप नेत्यांचा विरोध, भाजपचे सर्वेक्षण यामुळे गवळी यांची विकेट गेली असल्याची माहिती यवतमाळच्या शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलतांना दिली.
त्याबरोबरच हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाही मतदारसंघातील भाजपच्या चार आमदारांनी विरोध केला होता. मराठा आरक्षणासाठी दिल्लीला आंदोलन करणे, पक्षाच्या विरोधात राजीनामा देणे व अंतर्गत सर्वेक्षण, या सर्व गोष्टी उमेदवारीसाठी पाटील यांना अडथळा ठरल्याचे समजते. या दोन्ही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावरच विरोधकांनी व पक्षातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभा करण्यास सुरुवात केली आहे.
याचा राजकीय फटकाही शिंदे यांना बसणार आहे. शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पुढच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता हे १३ खासदार व चाळीस आमदार शिंदेंसोबत आले. मात्र तीन विद्यमान खासदारांची तिकिटे कापल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांमध्ये पसरली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना होणारा तोटा ...
-
शिंदे यांच्या नेतृत्वावरच प्रश्न
-
शिंदे गट भाजप चालवतात असा विरोधक प्रचार करणार
-
अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता
-
भाजपने लोकसभेला तीनशे पार केल्यास गटाला डावलले जाण्याची भीती.
-
अनेक कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटाकडे फिरण्याची शक्यता .
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




