
Mumbai : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. येत्या २२ सप्टेंबर पासून गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वाॅटर टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचे आणि जेएनपीए कर्मचार्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असा हा प्रवास एक तासांऐवजी केवळ ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
सध्या गेटवे ते जेएनपीए या मार्गावर लाकडी बोटींद्वारे प्रवास केला जातो. मात्र या बोटी जुन्या झाल्याने त्यातून प्रवास करताना सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित होतात. त्याशिवाय प्रवासासाठी लागणारा वेळही किमान एक तास असतो आणि कधीकधी हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे हा प्रवास आणखी लांबतो. या पार्श्वभूमीवर जेएनपीएने आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय शोधत ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ एक तासांवरून फक्त ४० मिनिटांवर येणार आहे.
प्रारंभी या वॉटर टॅक्सी परदेशात तयार करण्याचा विचार होता, मात्र नंतर ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देत त्यांची निर्मिती देशातच करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला हे काम सोपविण्यात आले आणि काही तांत्रिक कारणांमुळे झालेला विलंब संपवून अखेर या बोटी आता सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, मुंबईकरांसाठी ही सेवा एक नवे पर्व ठरणार असल्याचे सांगितले.
प्रथम टप्प्यात दोन ई वॉटर टॅक्सी सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी एक सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असेल. प्रत्येकी २० प्रवाशांची क्षमता असलेल्या या बोटी ताशी प्रवास जलद आणि सोयीस्कर करतील. यासाठी अपेक्षित प्रवासी दरही अगदी परवडणारा म्हणजे सुमारे १०० रुपये असणार आहे. या टॅक्सींच्या देखभाल आणि संचलनाची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुपकडे सोपविण्यात आली आहे.
भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल काझानी यांनी सांगितले की, सध्या जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होऊन पहिल्याच दिवशी प्रवाशांना सेवा मिळेल. पुढील टप्प्यात आणखी चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होईल आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा एक नवा आदर्श निर्माण होईल.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाहतुकीची समस्या ही कायमच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. विशेषतः गेटवे ते जेएनपीए या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करतात. ई वॉटर टॅक्सी सुरु झाल्यास या सर्वांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ होईल. प्रवाशांसोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही या सेवेला मोठी मागणी राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अखेर मुंबईकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून, २२ सप्टेंबरनंतर समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही नवी ई वॉटर टॅक्सी एक वेगळा आणि आधुनिक अनुभव ठरणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




