
Mumbai : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. येत्या २२ सप्टेंबर पासून गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वाॅटर टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचे आणि जेएनपीए कर्मचार्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असा हा प्रवास एक तासांऐवजी केवळ ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
सध्या गेटवे ते जेएनपीए या मार्गावर लाकडी बोटींद्वारे प्रवास केला जातो. मात्र या बोटी जुन्या झाल्याने त्यातून प्रवास करताना सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित होतात. त्याशिवाय प्रवासासाठी लागणारा वेळही किमान एक तास असतो आणि कधीकधी हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे हा प्रवास आणखी लांबतो. या पार्श्वभूमीवर जेएनपीएने आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय शोधत ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ एक तासांवरून फक्त ४० मिनिटांवर येणार आहे.
प्रारंभी या वॉटर टॅक्सी परदेशात तयार करण्याचा विचार होता, मात्र नंतर ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देत त्यांची निर्मिती देशातच करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला हे काम सोपविण्यात आले आणि काही तांत्रिक कारणांमुळे झालेला विलंब संपवून अखेर या बोटी आता सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, मुंबईकरांसाठी ही सेवा एक नवे पर्व ठरणार असल्याचे सांगितले.
प्रथम टप्प्यात दोन ई वॉटर टॅक्सी सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी एक सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असेल. प्रत्येकी २० प्रवाशांची क्षमता असलेल्या या बोटी ताशी प्रवास जलद आणि सोयीस्कर करतील. यासाठी अपेक्षित प्रवासी दरही अगदी परवडणारा म्हणजे सुमारे १०० रुपये असणार आहे. या टॅक्सींच्या देखभाल आणि संचलनाची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुपकडे सोपविण्यात आली आहे.
भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल काझानी यांनी सांगितले की, सध्या जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होऊन पहिल्याच दिवशी प्रवाशांना सेवा मिळेल. पुढील टप्प्यात आणखी चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होईल आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा एक नवा आदर्श निर्माण होईल.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाहतुकीची समस्या ही कायमच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. विशेषतः गेटवे ते जेएनपीए या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करतात. ई वॉटर टॅक्सी सुरु झाल्यास या सर्वांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ होईल. प्रवाशांसोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही या सेवेला मोठी मागणी राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अखेर मुंबईकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून, २२ सप्टेंबरनंतर समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही नवी ई वॉटर टॅक्सी एक वेगळा आणि आधुनिक अनुभव ठरणार आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


