
Mumbai : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेला (उद्धव ठाकरे) फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) या मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार दिल्यामुळे पक्षातील मराठी कार्यकर्ते आणि समर्थर नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. या निर्णयामुळे मराठी मते दुरावणार असल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनीही अपक्ष अर्ज भरल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा भाजपला मिळणार की मनसेला याबाबत उत्कंठा वाढली आहे.
पश्चिम उपनगरातील वर्सोवा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांना याच मतदारसंघातून सुमारे २१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वाट्याला आला असून या मतदारसंघात पक्षाने उपविभागप्रमुख हारून खान यांना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी नगरसेविका राजुल पटेल, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक देवेंद्र (बाळा) आंबेरकर, माजी नगरसेवक यशोधर फणसे यांची नावे चर्चेत होती. मात्र ठाकरे यांनी खान यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांसह शिवसैनिकही नाराज असल्याची चर्चा आहे.
|
|
वर्सोवा मतदारसंघात भाजपने भारती लव्हेकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांचे नाव जाहीर करण्यास भाजपने दिरंगाई केली होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वात आधी आपला उमेदवार जाहीर केला होता. गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिलेले संदेश देसाई यांनाच पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
भाजपचा मार्ग सुकर गेल्या वेळी या मतदारसंघातून शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांनी निवडणूक लढविली होती. तर राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळीही ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेनेची (उद्धव ठाकरे) मराठी मते ते मिळवणार का याबाबतही उत्सुकता आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) अल्पसंख्याक उमेदवार दिल्यामुळे या मतदारसंघात धार्मिक धृवीकरण होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपचा मार्ग सुकर झाल्याचीही चर्चा आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




