सरसंघचालक मोहन भागवत, जाती अंत लढाईImage Credit source: गुगल
RSS Chief Mohan Bhagwat on Caste System: हिंदू धर्मात जातीची उतरंड आणि जातीभेद, पोटजाती, जाती व्यवस्था असे अनेक वाद आहेत. त्याविषयी टीका आणि नाराजी पाहायला मिळते. जाती व्यवस्था हा हिंदू धर्मातील प्रमुख घटक आहे. जातीअंताच्या लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असा प्रश्न कायम विचारल्या जातो. डावी चळवळ आणि पुरोगामी, अनुसूचित जाती संघटना, बहुजन समाजातून संघाला याविषयी कायम विचारणा होते. याविषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मन मोकळं केलं. त्यांनी या विषयावर संघाची भूमिका स्पष्ट केली.
अखंड भारताची इच्छा
2047 मध्ये भारताचं विभाजन होईल ही भीती बाळगण्यापेक्षा 2047मध्ये अखंड भारताची कल्पना करा. सुलतान, बादशाह 500 वर्ष राहिला, इंग्रजांना 200 वर्षात जमलं नाही ते आता कसं होईल. स्वतंत्र भारतात तर शक्यच नाही. आता हा 1947 पूर्वीचा भारत राहिला नाही. अखंड भारत होईल आणि करून दाखवू ही इच्छा मनात बाळगा. भारताचे तुकडे होईल असं काही लोक स्वप्न पाहत आहेत.ते पूर्ण होणार नाही, असे सरसंघचालकांनी ठणकावून सांगितलं.
हिंदू आणि शीख एकच होते. आजही रोटीबेटी व्यवहार होतातच. रक्ताचं नातं आहे. पूजा वेगळी आहे. धर्म म्हणून शीख वेगळे आहेत. त्यांच्या विशिष्टेला मान्यता दिली पाहिजे. पण समाज म्हणून आपण सर्व एक आहोत. हे सर्व धर्म एकाच स्वभावाचे आहेत. त्यामुळे आपल्या एकात्मता स्त्रोतात या सर्व धर्माचे नावे घेतो. श्रद्धापूर्वक त्यांचं हृद्यात धारण करतो. गुरू ग्रंथ साहिबात फक्त शीखांची वाणी आहे का. तर संपूर्ण भारताची वाणी आहे. शीख पंथ म्हणून आचार विचार वेगळे असू शकतात. पण समाज आणि राष्ट्र म्हणून ते कधी वेगळे नव्हते. काश्मीर पंडितांची सुरक्षा त्यांनीच केली आहे. त्यामुळे त्याचं स्मरण झालं पाहिजे. नवीन एकता आणण्याची गरज नाही. जुनीच एकता पुढे न्यायची आहे यावर सरसंघचालकांनी खास जोर दिला.
जातीअंतावर सरसंघचालकांचे विचार काय?
पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बाळासाहेब देवरस यांचं भाषण झालं. त्यात संविधानातील सर्व आरक्षणाला समर्थन दिलं आहे. जातीयवाद जात नाही, तोपर्यंत आरक्षण राहिलं पाहिजे. जातीभेद दूर झाला असं ज्यांच्यावर जातीय अत्याचार झाले त्यांना वाटलं पाहिजे. आता भेद नाही. आता आरक्षणाची गरज नाही. असं आता सुरू झालं आहे. अनेकांनी आरक्षण सोडलं आहे. इतरांना दिलं आहे. जातीगत भेदभावाची सर्व कारणे गेली पाहिजे. आम्ही त्यावर ठोस भूमिका घेतली आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
व्यवस्था नियमाने दूर होणारी ही गोष्ट नाही. कायद्याने ही गोष्ट जाणार नाही. ही गोष्ट केवळ सदभावनेने दूर होईल. समाजात जे झालं ते गेलं. पण त्याचा परिणाम असा झाला की एक वर्ग खड्ड्यात आहे. ज्यांच्यासाठी आरक्षण आहे, ते खड्ड्यात आहे. जो मोठा आहे, त्याने आरक्षण घेतलं. जे खड्ड्यात पडलेले आहेत, त्यांना गुडघ्यावर उभं करून उचलंल पाहिजे. जे वर आहेत, त्यांनी खाली वाकून खड्ड्यातील लोकांना हात वर दिला आहे. २००० वर्षात ज्यांनी विषमता सोसली, त्यांना बाहेर आणण्यासाठी आपण २०० वर्ष सहन केलं तर काय झालं. आपलेच भाऊ आहेत. आपलाच देश आहे. प्राण थोडीच द्यायचे आहे. फक्त थोडंच सोडायचे आहे. त्यासाठी समजदारी पाहिजे. जे विषमतेचे दंश झेलत आहे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. नवीन पिढी म्हणते आम्ही केलं नाही. नवीन नियमाने प्रश्न निकाली निघत नाही हे सत्य आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे दोघांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. झगडा करू नये. काही घेतलं पाहिजे, काही सोडलं पाहिजे. त्यासाठी सदभावना ठेवली पाहिजे. समाजात फूट पडू नये. समजदारीने पुढे गेले पाहिजे. ही गोष्ट सर्वांमध्ये आली पाहिजे, असे विचार मोहन भागवत यांनी मांडला.
मला जात मिटवायची असेल तर सत्तेत येऊन मिटवली पाहिजे. समाजात जातीला थारा नाही असं कळल्यावर लोक जातीच्या नावाने मतदान मागणार नाही. जातीच्या नावाने मतमागणारे हे समतावादी नाहीत. ते मतवादी आहेत. त्यामुळे त्यावर सद्भावनाच उपया आहे. आपल्यासारख्या लोकांनी डोकं थंड ठेवलं पाहिजे. तरुणांनी आणि सोशल मीडियावरील लोकांनी शांत राहिलं पाहिजे.
जात नावाची व्यवस्था नाही. अव्यवस्था आहे. पूर्वी एक काम एक जात होती. आता तसं नाही. त्यामुळे जात पात आहे कुठे,. स्वार्थासाठी, राजकारणासाठी जात आहे. प्राण गेले, पण लाश घेऊन जात आहोत. जातीअंत होणं शक्य आहे. फक्त सद्भावनेचं परिवर्तन आलं पाहिजे. नंतर जातही जाईल, असा विश्वास सरसंघचालकांनी दाखवला.
[embedded content]
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




