अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा तालुक्यात आणि संपूर्ण मेळघाट परिसरात उन्हाची तीव्रता वाढताच भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे पडले असून विहिरी आणि कूपनलिका तळाला गेल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना तीव्र उन्हात तासनतास भटकंती करावी लागत आहे. गावांमधील पाणी संकट निवारण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत, मात्र टँकर येताच पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आणि झुंबड उडत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
महिला आणि बालकांचे पाण्यासाठी हाल
चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील गावांमध्ये परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. मोथा, खडीमल, आकी, बहाद्दरपूर यांसारख्या अनेक गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. प्रशासनाकडून गावांमध्ये टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडले जाते किंवा थेट टँकर उभे करून पाणी वाटप केले जाते. मात्र, गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने पाणी मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू होते. टँकर गावात येताच महिला, पुरुष आणि लहान मुले हंडे, ड्रम आणि बादल्या घेऊन टँकरभोवती गर्दी करतात. अनेकदा वेळेवर आणि पुरेसे पाणी न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अनेक गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या २० पेक्षा जास्त टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणी संकट कमी करण्यासाठी प्रशासनाने सुमारे १७ हून अधिक गावांमध्ये खासगी विहिरी आणि बोअरवेलचे तात्पुरते अधिग्रहण केले आहे. मात्र, उन्हाची पातळी ४2 अंशाच्या पार गेल्याने विहिरींमधील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसातील ५ ते ६ तास घालवावे लागत असून, त्यामुळे त्यांच्या रोजगारावरही परिणाम होत आहे.
प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
मे महिन्याच्या अखेरीस परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केवळ टँकरवर अवलंबून न राहता गावांमध्ये कायमस्वरूपी नळ योजना किंवा पाण्याचे टँकर वाढवून देण्याची मागणी मेळघाटातील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास येत्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे.
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



