5 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

ईडी आणि इतर तपास संस्था निवडणुकीपूर्वीच विरोधीपक्षांना लक्ष्य करतात का? प्रथमत: या प्रश्नावर ईडीचा -आणि भाजपचा युक्तिवाद - सैद्धांतिकदृष्ट्या योग्यवाटतो : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील कारवाईनिवडणुकीच्या टप्प्यांद्वारे निश्चित केली जाऊ शकतनाही. गैरकृत्ये समोर येत असतील तर राजकीयकॅलेंडरची पर्वा न करता तपास केला पाहिजे. कोणाच्याहीसोयीसाठी त्यांना थांबवू नये. पण, हा केवळ योगायोग आहे का की निवडणुकीपूर्वीविरोधी पक्षांना सातत्याने लक्ष्य केले जाते. केंद्रातीलसत्ताधारी पक्षाला अशा तपासांना सामोरे जावे लागतनाही? संविधानाने असे आदेश दिले आहेत की तपाससंस्थांनी भीती किंवा पक्षपात न करता काम करावे. त्यांनी राजकीय फायदा घेण्याऐवजी त्यांची कर्तव्ये पारपाडावीत. तरीसुद्धा गेल्या दशकातील राजकीय कथेचा बारकाईने विचार केल्यास ईडी आणि सीबीआयन्यायाच्या साधनांपेक्षा राजकारणाचे साधन म्हणून अधिक काम करत आहेत या विश्वासाला बळकटी मिळते. राजकारणात सार्वजनिक धारणा ही लोकशाही स्पर्धा अवलंबून असलेल्या वर्तन, विश्वास आणि निष्पक्षतेला आकार देते. लाखो मतदारांना निवडणूक क्षेत्रातअसमानता जाणवू लागते तेव्हा निकालांची वैधता आणिलोकशाही जाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणूनच केंद्रीयसंस्थांकडून पक्षपातीपणाची धारणा केवळ तक्रार म्हणूनपाहू नये; ती लोकशाहीमध्ये समान सहभागाच्या भावनेतरुजलेली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीतृणमूलच्या राजकीय सल्लागार कंपनी-आय-पीएसीवरील छाप्यामुळे ही धारणा आणखी बळकटझाली. सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. राज्यआणि केंद्राच्या निवडणुकांमध्ये ‘आप’ला देखील ईडीआणि सीबीआयच्या अशाच कारवाईचा सामना करावालागला होता. २०२१ च्या तामिळनाडू विधानसभानिवडणुकीदरम्यान द्रमुक प्रमुख एमके स्टॅलिन यांच्याकुटुंबातील सदस्यांवर आयकर छापे टाकण्यात आले होतेआणि ईडीने अनेक मंत्र्यांचीही चौकशी केली होती. गेल्यादशकातील अशा कृतींना निवडणूक परिदृश्यातून वेगळेकरून पाहणे कठीण आहे. हे तपास संस्था राजकीयपोकळीत काम करत नाहीत. विशेषतः निवडणुकीदरम्यानते प्रमुख नेत्यांविरुद्ध - जाणूनबुजून किंवा चुकून -कारवाई करतात तेव्हा त्याचे राजकीय परिणामअपरिहार्यपणे होतात. २०१४ पासून उपलब्ध असलेल्याडेटाच्या विश्लेषणातून असे दिसून येते की सीबीआयआणि ईडीने दाखल केलेली सुमारे ९५% प्रकरणे विरोधीनेत्यांविरुद्ध आहेत. ईडीच्या छाप्यांमध्येही लक्षणीय वाढझाली आहे. २०१४ पर्यंतच्या दशकात ईडीच्या छाप्यांचीसंख्या शंभरच्या आसपास होती. ती नंतरच्या दशकातहजारोंवर पोहोचली. आणि सध्याच्या केंद्रीयमंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांपैकी २९ मंत्र्यांवर (जवळपास४०%) गुन्हेगारी खटले दाखल आहेत हे असूनही असेघडते. ही माहिती मंत्र्यांनी स्वतः निवडणूक आयोगालादिलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यात हत्या,खून करण्याचा प्रयत्न, अपहरण, चोरी आणि फसवणूकयासारख्या आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणांचीचौकशी देखील त्याच कठोरतेने आणि वेगाने झाली आहेका? राजकीयदृष्ट्या एका पक्षावर हा पद्धतशीर दबाव हेतूसिद्ध करत नसला तरी तो असमानतेची धारणा निश्चितचबळकट करतो. व्यवस्थेत संस्थांवर विश्वास आधीचकमी आहे. तिथे लोकशाही स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीरशंका निर्माण होतात. लक्षात घ्या की आपण येथेआरोपांच्या गुणवत्तेवर चर्चा करत नाहीत; त्यासाठीचौकशी आवश्यक आहे. परंतु कोणत्याही लोकशाहीमध्येएक पक्ष निवडणूक प्रचारादरम्यानही संस्थात्मकतटस्थतेचा पूर्ण फायदा घेत असेल आणि दुसरा पक्षसतत तपासणीला सामोरे जात असेल तर समान संधीचीभावना कमकुवत होते. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचेआरोप हे केवळ वैयक्तिक बाबी नाहीत; तर तोविश्वासाचा प्रश्न आहे. हा विश्वास तुटतो तेव्हा त्याचादबाव संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर जाणवतो.

मतदारांना असे वाटू लागते कीनिवडणुकीचे मैदान समतुल्य नाही, तेव्हानिकालांची वैधता आणि लोकशाहीजाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणून,केंद्रीय संस्थांकडून पक्षपातीपणाच्याधारणेकडे तक्रार म्हणून पाहिले जाऊ नये.

This post was originally published on this site.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




