5 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

ईडी आणि इतर तपास संस्था निवडणुकीपूर्वीच विरोधीपक्षांना लक्ष्य करतात का? प्रथमत: या प्रश्नावर ईडीचा -आणि भाजपचा युक्तिवाद - सैद्धांतिकदृष्ट्या योग्यवाटतो : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील कारवाईनिवडणुकीच्या टप्प्यांद्वारे निश्चित केली जाऊ शकतनाही. गैरकृत्ये समोर येत असतील तर राजकीयकॅलेंडरची पर्वा न करता तपास केला पाहिजे. कोणाच्याहीसोयीसाठी त्यांना थांबवू नये. पण, हा केवळ योगायोग आहे का की निवडणुकीपूर्वीविरोधी पक्षांना सातत्याने लक्ष्य केले जाते. केंद्रातीलसत्ताधारी पक्षाला अशा तपासांना सामोरे जावे लागतनाही? संविधानाने असे आदेश दिले आहेत की तपाससंस्थांनी भीती किंवा पक्षपात न करता काम करावे. त्यांनी राजकीय फायदा घेण्याऐवजी त्यांची कर्तव्ये पारपाडावीत. तरीसुद्धा गेल्या दशकातील राजकीय कथेचा बारकाईने विचार केल्यास ईडी आणि सीबीआयन्यायाच्या साधनांपेक्षा राजकारणाचे साधन म्हणून अधिक काम करत आहेत या विश्वासाला बळकटी मिळते. राजकारणात सार्वजनिक धारणा ही लोकशाही स्पर्धा अवलंबून असलेल्या वर्तन, विश्वास आणि निष्पक्षतेला आकार देते. लाखो मतदारांना निवडणूक क्षेत्रातअसमानता जाणवू लागते तेव्हा निकालांची वैधता आणिलोकशाही जाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणूनच केंद्रीयसंस्थांकडून पक्षपातीपणाची धारणा केवळ तक्रार म्हणूनपाहू नये; ती लोकशाहीमध्ये समान सहभागाच्या भावनेतरुजलेली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीतृणमूलच्या राजकीय सल्लागार कंपनी-आय-पीएसीवरील छाप्यामुळे ही धारणा आणखी बळकटझाली. सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. राज्यआणि केंद्राच्या निवडणुकांमध्ये ‘आप’ला देखील ईडीआणि सीबीआयच्या अशाच कारवाईचा सामना करावालागला होता. २०२१ च्या तामिळनाडू विधानसभानिवडणुकीदरम्यान द्रमुक प्रमुख एमके स्टॅलिन यांच्याकुटुंबातील सदस्यांवर आयकर छापे टाकण्यात आले होतेआणि ईडीने अनेक मंत्र्यांचीही चौकशी केली होती. गेल्यादशकातील अशा कृतींना निवडणूक परिदृश्यातून वेगळेकरून पाहणे कठीण आहे. हे तपास संस्था राजकीयपोकळीत काम करत नाहीत. विशेषतः निवडणुकीदरम्यानते प्रमुख नेत्यांविरुद्ध - जाणूनबुजून किंवा चुकून -कारवाई करतात तेव्हा त्याचे राजकीय परिणामअपरिहार्यपणे होतात. २०१४ पासून उपलब्ध असलेल्याडेटाच्या विश्लेषणातून असे दिसून येते की सीबीआयआणि ईडीने दाखल केलेली सुमारे ९५% प्रकरणे विरोधीनेत्यांविरुद्ध आहेत. ईडीच्या छाप्यांमध्येही लक्षणीय वाढझाली आहे. २०१४ पर्यंतच्या दशकात ईडीच्या छाप्यांचीसंख्या शंभरच्या आसपास होती. ती नंतरच्या दशकातहजारोंवर पोहोचली. आणि सध्याच्या केंद्रीयमंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांपैकी २९ मंत्र्यांवर (जवळपास४०%) गुन्हेगारी खटले दाखल आहेत हे असूनही असेघडते. ही माहिती मंत्र्यांनी स्वतः निवडणूक आयोगालादिलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यात हत्या,खून करण्याचा प्रयत्न, अपहरण, चोरी आणि फसवणूकयासारख्या आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणांचीचौकशी देखील त्याच कठोरतेने आणि वेगाने झाली आहेका? राजकीयदृष्ट्या एका पक्षावर हा पद्धतशीर दबाव हेतूसिद्ध करत नसला तरी तो असमानतेची धारणा निश्चितचबळकट करतो. व्यवस्थेत संस्थांवर विश्वास आधीचकमी आहे. तिथे लोकशाही स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीरशंका निर्माण होतात. लक्षात घ्या की आपण येथेआरोपांच्या गुणवत्तेवर चर्चा करत नाहीत; त्यासाठीचौकशी आवश्यक आहे. परंतु कोणत्याही लोकशाहीमध्येएक पक्ष निवडणूक प्रचारादरम्यानही संस्थात्मकतटस्थतेचा पूर्ण फायदा घेत असेल आणि दुसरा पक्षसतत तपासणीला सामोरे जात असेल तर समान संधीचीभावना कमकुवत होते. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचेआरोप हे केवळ वैयक्तिक बाबी नाहीत; तर तोविश्वासाचा प्रश्न आहे. हा विश्वास तुटतो तेव्हा त्याचादबाव संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर जाणवतो.

मतदारांना असे वाटू लागते कीनिवडणुकीचे मैदान समतुल्य नाही, तेव्हानिकालांची वैधता आणि लोकशाहीजाणीव दोन्ही धोक्यात येतात. म्हणून,केंद्रीय संस्थांकडून पक्षपातीपणाच्याधारणेकडे तक्रार म्हणून पाहिले जाऊ नये.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: सुपे-चौफुला मार्गावर दुचाकी घसरून थेट ट्रकखाली आल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
- पुणे हवामान अंदाज: शहरात पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज"
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- अहमदनगरमध्ये नीट परीक्षेचा धक्कादायक निकाल; पुनर्परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून उचलले टोकाचे पाऊल
महाराष्ट्र
- मुंबई: महालक्ष्मी येथे मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेला जोडणाऱ्या देशातील पहिल्या 'सरकत्या मार्गाचे' ९० टक्के काम पूर्ण
- पुणे: सुपे-चौफुला मार्गावर दुचाकी घसरून थेट ट्रकखाली आल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
- पुणे हवामान अंदाज: शहरात पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज"
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
गुन्हा
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा


























Subscribe to my channel



