
Laxman Hake : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालना येथे उपोषणाला बसलेले ओबीसी समाजाचे नेते आणि आमदार लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जरांगे धमक्या देऊ नका, छगन भुजबळ- पंकजा मुंडेंना टार्गेट करणं बंद करा. आमच्या नेत्यांवर बोलू नका. हा लक्ष्मण हाके तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयार असेल.', असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. यासोबतच, जरांगेंनी आरक्षणाचा थोडासा अभ्यास करावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
लक्ष्मण हाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. भुजबळांना टार्गेट करणाऱ्या जरांगेवर टीका करत लक्ष्मण हाके यांनी अनेक प्रश्न विचारले. '७० वर्षे कुणाचं खायचा प्रश्न येत नाही. २७-२८ वर्षांत काय मिळाले आहे. ते नेहमी छगन भुजबळांना टार्गेट करून बोलतात. भुजबळ तू सगळं खालं असे ते म्हणतात. या जरांगेंना माझा एक सवाल आहे. एकनाथ शिंदे मुंख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसींना १०० टक्क्यापैकी १ टक्केसुद्धा बजेट या महाराष्ट्राने राबवले नाही. आमदार कोण, खासदार कोण, मुख्यमंत्री कोण सगळे मराठेच आहेत ना. ओबीसींना १ टक्कासुद्धा बजेट देत नाहीत आणि कुणी कुणाचा खायचा प्रश्न येतो.जर ओबीसींनी आरक्षण खाल्ल असतं तर ओबीसीचे राज्यात ४०० कारखाने दिसले असते. राज्यात २०० साखर कारखाने आहेत. यामधील १० ते १५ कारखाने सोडले तर ९० टक्के कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत.'
ओबीसी आणि मराठवाड्यात काडी फक्त छगन भुजबळांनी लावली असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांची राजकीय कारकिर्द उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा दिला होता. यावर बोलताना हाके यांनी सांगितले की, 'राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे. तू कोण राजकीय काारकिर्द उद्ध्वस्त करणारा. या महाराष्ट्रातला ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी हा एक झाला तर त्यांनी स्वाभिमानाला मत दिले तर येणारा काळ ठरवेल फुले-शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे.',
मी जातीयवाद केला नाही असे म्हणणाऱ्या जरांगे पाटील यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी जोरदार निशाणा साधला. 'छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, महादेव जाणकर, मुंडे बहीण-भाऊ, वडेट्टीवार असतील हे सर्वजण राज्यातील जाती उपजातीसह ४९२ जातीची भाषा बोलतात. जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलत आहात. मग नक्की जातीयवादी कोण? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला पाहिजे.' तसंच, 'गेली ७ ते ८ महिने आम्ही शांत बसलो. आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो. तुम्ही संविधानिक मार्गाने आंदोलनं केली ती आम्ही पाहिली. तुम्ही बीड शहर जाळले. टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केले. त्यांची हॉटेल-घरं जाळली. मग जातीयवाद कोण करतंय.', असा सवाल हाके यांनी केला आहे.
त्यासोबतच, 'जरांगेंनी थोडासा आरक्षणाचा अभ्यास करावा. मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आहेत. जरांगे बोलताना सावधपणे आणि सल्लागाराचा योग्य सल्ला घेऊन बोलत जा.', असा सल्ला लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. 'या देशांमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेने जिरवली आहे. यामध्ये अटलजी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचा देखील पराभव झाला आहे. तू कुठला कोण काय आहे. लोकशाहीमध्ये असल्या धमक्या देऊ नका. असे चॅलेंज आम्हाला करू नका. आमच्याकडे मॅन, मनी मसल पावर नाही. लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे. जरांगे तुम्ही छगन भुजबळ, महादेव जानकर, मुंडे बहीण-भावांना टार्गेट करू नका.', असे देखील हाके यांनी सांगितले.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




