
Eknath Khadse : एकेकाळी राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्याच एकनाथ खडसेंना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडाव लागलं होतं. तेंव्हापासून एकनाथ खडसे जरी भाजपमध्ये असले तरी त्यांचा पक्षातील वावर असून नसल्यासारखाच होता. अखेर कोरोनानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच घड्याळ बांधल.
पुढं भाजपवर आणि त्यातही प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर टिका करणारी विरोधी पक्षातील पहिली व्यक्ती म्हणजे एकनाथ खडसे. याच एकनाथ खडसेंना शरद पवारांनी पुढे विधानपरिषदेची आमदारकी दिली आणि रावेर लोकसभा निवडणुकीची तयारीही करायच्या सुचना दिल्या होत्या. मात्र रावेर लोकसभा लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसेंना भाजपकडून तिकीट जाहीर झाल्याने खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली. सोबतच रक्षा खडसे यांच्यासाठी काम करणार असल्याचं म्हणत पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तेंव्हापासून खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र लोकसभेची निवडणुक झाल्यानंतरही खडसेंचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. आता तो लवकरच होईल, असं बोललं जातंय आणि त्यासाठी कारण समोर आलंय ते म्हणजे एकनाथ खडसे यांनी घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट.
|
|
शहांच्या भेटीनंतर लवकरच प्रवेश होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला जी मंत्रिपद मिळालीत, त्यात एक मंत्रिपद मिळाले ते रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना. रक्षा खडसे यांच्याकडे केंद्रीय क्रीडा राज्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. रक्षा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी काल रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रक्षा यांच्या भेटीवेळी त्यांच्यासोबत एकनाथ खडसे हेही उपस्थित होते.
एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चाही झाली. एकनाथ खडसे हे पुर्वी भाजपमध्ये असताना त्यांनी अमित शहाणा यांची अनेक वेळा भेट घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून दोघांची भेट झाली नव्हती. या भेटीत खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खडसे भाजपवासी होऊ शकतात, अशी माहिती आहे. माझा पक्षप्रवेश दिल्लीत होईल, असं खुद्द एकनाथ खडसे यांनी याआधीच सांगितलं आहे. त्यामुळं खडसेंचा प्रवेश अमित शहा यांच्या हस्ते होणार का? याची उत्सुकता लागलीय..
खडसेंची उपयुक्तता वाढलीय का ?
एकनाथ खडसे हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते आहेत. ज्यावेळी राज्यात भाजपची परिस्थिती चांगली नव्हती, तेंव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्यासोबत एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत राज्यात भाजप वाढवली होती. एकनाथ खडसेंकडे राज्यातील मोठा ओबीसी नेता म्हणूनही पाहिलं जातं. सोबतच उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांचं मोठ कार्यकर्त्यांचं जाळं आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात खूप मोठा फटका बसलाय. 28 जागा लढणाऱ्या भाजपला राज्यात फक्त 9 जागांवर विजय मिळवता आलाय.
सध्या जरी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले तरी उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ज्या दोन जागा निवडून आल्यात, त्या दोन्हीही जागा या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मागच्या अनेक दशकांपासून एकनाथ खडसे यांच वर्चस्व असल्याचं पहायला मिळालं. त्याचीच पुनरावृत्ती याही निकालात आलीय त्यामुळं एकनाथ खडसे यांच महत्त्व पुन्हा एकदा अधोरिखीत झालं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



