
Jalgaon : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्याने शेकडो संतप्त महिलांनी आज जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रावर धाड टाकली. कार्यालयात घुसून महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमका गोंधळ काय?
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. जळगाव जिल्ह्यात तब्बल १० लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीपूर्वी मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जळगावमधील सुमारे १ लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. दीड वर्षांपासून सुरळीत सुरू असलेला लाभ अचानक बंद झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
|
|
केवायसीचा (KYC) जाच आणि तांत्रिक बिघाड या गोंधळाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, केवायसी (KYC) प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. "आम्ही सर्व कागदपत्रे दिली, केवायसी केली, तरीही आमचे पैसे का कापले?" असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. केवायसी करूनही तांत्रिक कारणास्तव लाभ मिळत नसल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कार्यालयात धडक दिली.
मंत्री म्हणतात १८१ ला फोन करा, पण संपर्क होईना!
काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना काही अडचणी असल्यास १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. मात्र, जळगावमधील महिलांनी तक्रार केली आहे की, या हेल्पलाइन क्रमांकावर फोन लागतच नाही. "सरकार फक्त घोषणा करतंय, पण जमिनीवर आम्हाला मदतीऐवजी फक्त मनस्ताप मिळतोय," असा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे.
अधिकाऱ्यांची पळापळ
शेकडो महिला एकाच वेळी कार्यालयात घुसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. लवकरात लवकर तांत्रिक त्रुटी दूर करून रखडलेले पैसे खात्यात जमा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे. आता या १ लाख महिलांना त्यांचे हक्काचे पैसे कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल


























Subscribe to my channel




