
Kolhapur : कौटुंबिक तणावातून तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. कोल्हापुरातील राजाराम तलावात एका व्यक्तीने चक्क पाठीवर दगड विटांनी भरलेली बॅग अडकवून आत्महत्या केली आहे. जयसिंगपूर येथील या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी आपल्या मित्र परिवारातील सर्वांना आणि कुटुंबीयांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता. त्यामुळे या घटनेने कोल्हापूर सह जयसिंगपुरात खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर शहरातील तरुण दंतचिकित्सक अवधूत प्रकाश मुळे (वय 35, रा. जयसिंगपूर - 11 वी गल्ली) यांनी कौटुंबिक तणाव आणि मानसिक नैराश्याच्या स्थितीतून शुक्रवारी उशिरा रात्री राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांची दुचाकी आढळल्याने या घटनेचा उलगडा झाला. तर शोध घेतल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. राजारामपुरी पोलिसांनी सुसाईड नोट आणि मोबाईल संदेश जप्त करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
|
|
राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना तलावाच्या काठावर दुचाकी उभी असल्याचे दिसले. दुचाकीवर एक हाताने लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. प्राथमिक तपासात ही दुचाकी अवधूत मुळे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. तलावाच्या परिसरात शोध घेतल्यानंतर, अवधूत यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तपासादरम्यान त्यांच्या पाठीवरील बॅगेत दगड आणि विटा असल्याचे निदर्शनास आले. तलावात उडी घेतल्यानंतर मृतदेह पाण्यावर न येण्यासाठी त्यांनी असे केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री अवधूत यांनी आपल्या काही जवळच्या मित्रांना आणि परिचितांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते. “मी पाठीवरील बॅगेत दगड विटा भरून तलावात उडी घेत आहे, मृतदेह पाण्याबाहेर यायला वेळ लागेल” अशा आशयाचे भावनिक मेसेज त्यांनी पाठवले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून पोलिसांना देण्यात आली आहे. या संदेशांमधून मानसिक नैराश्याची स्पष्ट चिन्हे दिसून आली आहेत. पोलिसांनी संबंधित मोबाईल संदेश तपासासाठी हस्तगत केले आहेत.
माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथक आणि अग्निशमन दलाची शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुमारे चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात आत्महत्येचा निष्कर्ष नोंदविण्यात आला असून, सुसाईड नोट आणि मोबाईल संदेशांच्या आधारे सखोल तपास सुरू असल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.
अवधूत मुळे हे जयसिंगपूरमधील एक प्रस्थापित दंतचिकित्सक म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईक आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत.
दरम्यान, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, अवधूत यांच्या नैराश्येमागच्या आणि आत्महत्येच्या कारणांचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




