
Kolhapur : कौटुंबिक तणावातून तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. कोल्हापुरातील राजाराम तलावात एका व्यक्तीने चक्क पाठीवर दगड विटांनी भरलेली बॅग अडकवून आत्महत्या केली आहे. जयसिंगपूर येथील या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी आपल्या मित्र परिवारातील सर्वांना आणि कुटुंबीयांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता. त्यामुळे या घटनेने कोल्हापूर सह जयसिंगपुरात खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर शहरातील तरुण दंतचिकित्सक अवधूत प्रकाश मुळे (वय 35, रा. जयसिंगपूर - 11 वी गल्ली) यांनी कौटुंबिक तणाव आणि मानसिक नैराश्याच्या स्थितीतून शुक्रवारी उशिरा रात्री राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांची दुचाकी आढळल्याने या घटनेचा उलगडा झाला. तर शोध घेतल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. राजारामपुरी पोलिसांनी सुसाईड नोट आणि मोबाईल संदेश जप्त करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
|
|
राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना तलावाच्या काठावर दुचाकी उभी असल्याचे दिसले. दुचाकीवर एक हाताने लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. प्राथमिक तपासात ही दुचाकी अवधूत मुळे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. तलावाच्या परिसरात शोध घेतल्यानंतर, अवधूत यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तपासादरम्यान त्यांच्या पाठीवरील बॅगेत दगड आणि विटा असल्याचे निदर्शनास आले. तलावात उडी घेतल्यानंतर मृतदेह पाण्यावर न येण्यासाठी त्यांनी असे केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री अवधूत यांनी आपल्या काही जवळच्या मित्रांना आणि परिचितांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते. “मी पाठीवरील बॅगेत दगड विटा भरून तलावात उडी घेत आहे, मृतदेह पाण्याबाहेर यायला वेळ लागेल” अशा आशयाचे भावनिक मेसेज त्यांनी पाठवले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून पोलिसांना देण्यात आली आहे. या संदेशांमधून मानसिक नैराश्याची स्पष्ट चिन्हे दिसून आली आहेत. पोलिसांनी संबंधित मोबाईल संदेश तपासासाठी हस्तगत केले आहेत.
माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथक आणि अग्निशमन दलाची शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुमारे चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात आत्महत्येचा निष्कर्ष नोंदविण्यात आला असून, सुसाईड नोट आणि मोबाईल संदेशांच्या आधारे सखोल तपास सुरू असल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.
अवधूत मुळे हे जयसिंगपूरमधील एक प्रस्थापित दंतचिकित्सक म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईक आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत.
दरम्यान, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, अवधूत यांच्या नैराश्येमागच्या आणि आत्महत्येच्या कारणांचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



