
Jejuri : ज्येष्ठ समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमातील मुलांना आधार कार्ड मिळत नसल्याबद्दल न्यायमूर्ती अभय ओक यांनी खंत व्यक्त केली.आपण जिल्हा विधी सेवा केंद्राकडून अनाथ मुलांच्या आधार कार्डसाठी स्वतंत्र यादी तयार करून दिल्लीला पाठवावी, त्यावर आपण तात्काळ निर्णय घेऊन निराधारांना आधार कार्ड देऊ असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी सासवड येथील कार्यक्रमात सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथील वाघिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) , महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (पुणे) आणि तालुका विधी सेवा समिती (सासवड) यांच्यावतीने आयोजित केलेल्या महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित पाहुण्यांना झाडांची रोपे देण्यात आली.
न्यायमूर्ती ओक पुढे म्हणाले, निराधारांच्या आधार कार्डचा प्रश्न हा संपूर्ण राज्यातील असू शकतो याची माहिती घेण्यात यावी. निराधार व्यक्तींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात यावी, यावर देखील योग्य तो निर्णय घेण्यात येईल, त्याचबरोबर या शासनाच्या विविध योजना या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जे लाभार्थी आज अर्ज करतील त्यांना तीन महिन्यांमध्ये लाभ मिळाला पाहिजे ,तो जर मिळाला नाही तर जिल्हा विधी सेवा केंद्राने त्याचा पाठपुरावा करावा. स्त्री व पुरुष असा भेदभाव करण्यात येऊ नये .
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती रेवती डेरे यांनी सांगितले की, सर्व शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांनी या सर्वांना सरकारच्या कल्याणकारी योजना, मोफत कायदे विषयक सल्ला व कायदेविषयक योजनांची माहिती घेऊन याचा लाभ घ्यावा. संविधान आपला आधार आहे. सर्वांना न्याय मिळणे हा मुलभूत उद्देश असल्याचे डेरे यांनी सांगितले .
जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी महाराष्ट्रामध्ये जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, या आर्थिक दुर्बल घटकांना शासनाच्या विविध सेवा मिळाल्या पाहिजेत . तळागाळातील नागरिकांना या योजनांचा फायदा होणे गरजेचे आहे . धर्मादाय हॉस्पिटलमधून नागरिकांना मोफत उपचार सुविधा दिल्या जातात , त्याचबरोबर आंतरजातीय विवाहासाठी विशेष अनुदान दिले जाते. याचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती रेवती डेरे, न्यायाधीश संदीप मारणे, न्यायाधीश आरीफ सा. डॉक्टर, सासवडचे न्यायाधीश मोहम्मद ताहेर बिलाल, सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भारंबे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालय, विधी सेवा प्राधिकरण, महिला बाल विकास, जिल्हा परिषद, एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती देणार्या स्टॉललला पाहुण्यांनी भेट दिली.
यावेळी बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर येथील अध्यक्ष व वकील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भारंबे,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुचिता राठोड, डॉ दिपक डोगरे, ॲड. मनोहर पवार यांनी केले. तर आभार जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव सोनल पाटील यांनी मानले.
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




