जळगावच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्ती योजनेत ६५ हजार शेतकरी पात्र; ३५ हजारांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिली यादी जाहीर!

जळगाव:राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील थकबाकीदार आणि पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध बँका आणि सेवा संस्थांमार्फत एकूण ८७ हजार ८२६ कर्जखात्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६५ हजार ३४३ कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

३५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण:

प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. उर्वरित सुमारे ३० हजार शेतकऱ्यांनीही तातडीने आपले प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

२ लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्जमाफीचा लाभ:

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन प्रमुख घटक समाविष्ट आहेत. यातील पात्र शेतकरी ५० हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.

ॲग्रीस्टॅक नोंदणी अन् ई-केवायसी अनिवार्य:

कर्जमाफीची रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी आधार प्रमाणीकरणासोबतच 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) पोर्टलवर फार्मर आयडी (Farmer ID) नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आली आहेत, त्यांनी आपल्या नजीकच्या महा-ई-सेवा केंद्र, सांग्राम केंद्र किंवा संबंधित विकास सोसायटी/बँकेत जाऊन प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेद्वारे रक्कम जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *