
IPL 2024 playoff scenarios : इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गुरुवारी (16 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघात सामना होणार होता. मात्र हैदराबादला गुरुवारी सातत्याने पावसाची धार सुरू असल्याने हा सामना रद्द करण्यात आला.
या सामन्यात एकही चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक पाँइंट वाटून देण्यात आला. यामुळे आता हैदराबादचे 15 पाँइंट्स झाल्याने त्यांनी प्लेऑफचे तिकीट मिळवले.
त्यामुळे आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेळ करणारा हैदराबाद तिसरा संघ ठरला. हैदराबादपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनीही प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता केवळ प्लेऑफमधील एक जागा शिल्लक आहे.
या एका जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे चार संघ शर्यतीत आहेत. पण त्यातही दिल्ली आणि लखनौ यांच्यासाठी केवळ गणितीय समीकरणानुसार हे आव्हान कायम आहे. कारण दिल्लीचे सर्व 14 साखळी सामने खेळून झाले असून त्यांचे 14 पाँइंट्स आहेत.
मात्र, त्यांचा नेट रन रेट चेन्नई आणि बेंगळुरूपेक्षा कमी आहे. तसेच लखनौचा एक सामना बाकी आहे, त्यामुळे तेही 14 पाँइंट्सपर्यंत पोहचू शकतात. पण त्यांचाही नेट रन रेट बाकी संघांपेक्षा कमी आहे.
|
आरसीबीची प्रयत्नांची शर्थ सुरुच, पण 'प्लेऑफ'मध्ये स्वदेशी ते परदेशी मातब्बर कोणीच स्थान देईना! |
याचमुळे सध्या सर्वाधिक चुरस चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात आहे. विशेष म्हणजे हे दोन संघच त्यांचा अखेरचा साखळी सामना 18 मे रोजी खेळणार आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ निश्चित करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.
जर या सामन्यात चेन्नईने कोणत्याही फरकाने विजय मिळवला, तरी ते प्लेऑफमध्ये थेट प्रवेश करतील. कारण जर विजय मिळवला, तर तो चेन्नईचा 8 वा विजय असेल, त्यामुळे ते 16 पाँइंट्स मिळवतील. पण जरी पराभूत झाले, तर चेन्नईला प्लेऑफची संधी असणार आहे.
मात्र, त्यांना याची काळजी घ्यावी लागेल की बंगळुरू 18 पेक्षा अधिक धावांनी किंवा 11 चेंडू राखून जिंकणार नाही. पण जर बेंगळुरूने 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून विजय मिळवला, तर बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरतील. कारण मग त्यांचे आणि चेन्नई 14 पाँइंट्ससह बरोबरीवर असतील, मात्र बेंगळुरूचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला असेल.
दरम्यान, चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर या सामन्यातही पावसाचा अडथळा आला आणि सामना रद्द झाला, तर चेन्नई प्लेऑफसाठी 15 पाँइंट्ससह पात्र ठरतील, तर बेंगळुरूचे आव्हान संपेल.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




