मुंबई: ट्रेनमधून विनातिकीट (Ticketless) किंवा रेल्वेचे नियम मोडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात भारतीय रेल्वेने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या 'जन विश्वास (तरतुदींचे संपादन) अधिनियम, २०२६' (Jan Vishwas Act, 2026) अंतर्गत रेल्वे कायदा, १९८९ च्या विविध कलमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार, आता ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास द्यावा लागणारा किमान दंड थेट दुप्पट करण्यात आला आहे. हा नवा नियम आजपासून म्हणजेच २० जून २०२६ पासून देशभरात तात्काळ लागू करण्यात आला आहे.
किमान २५० रुपयांऐवजी आता मोजावे लागणार ५०० रुपये
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, यापूर्वी रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १३७ आणि १३८ अंतर्गत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किमान २५० रुपये अधिक प्रवासाचे तिकीट भाडे एवढा दंड आकारला जात होता. मात्र, नवीन नियमांनुसार हा किमान २५० रुपयांचा दंड आता वाढवून थेट ५०० रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच, कोणत्याही वर्गातून विनातिकीट प्रवास करताना टीटीईने (TTE) पकडल्यास प्रवाशांना प्रवासाच्या भाड्याव्यतिरिक्त किमान ५०० रुपये अतिरिक्त पेनल्टी भरावीच लागेल. दंड न भरल्यास ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा न्यायालयीन कारवाई होऊ शकते.
इतर नियम उल्लंघनांवरही कडक दणका
केवळ विनातिकीट प्रवासच नाही, तर रेल्वे परिसरातील इतर गुन्ह्यांसाठीही दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे:
-
इतरांच्या तिकिटावर प्रवास करणे: जर एखादा प्रवासी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या तिकिटावर प्रवास करताना आढळला, तर त्याचे तिकीट जप्त केले जाईल, तसेच त्याला ५०० रुपये दंडासह नवीन तिकीट भाडे भरावे लागेल.
-
रेल्वे परिसरात उपद्रव किंवा गैरवर्तन: ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर दारू पिऊन हुल्लडबाजी करणे, शिवीगाळ करणे किंवा सहप्रवाशांना त्रास दिल्यास आता १,००० रुपये दंड आकारला जाईल.
-
अनाधिकृत फेरीवाले आणि भिकारी: ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर अनधिकृतपणे वस्तू विकणाऱ्या आणि भीक मागणाऱ्यांवर २,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल. पुन्हा तोच गुन्हा केल्यास १ वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
-
धोकादायक वस्तू वाहून नेणे: ट्रेनमध्ये प्रतिबंधित आणि ज्वलनशील वस्तू घेऊन प्रवास करणाऱ्यांना आता किमान १०,००० रुपयांचा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो.
कारवाईचे मुख्य कारण काय?
भारतीय रेल्वेत दरवर्षी कोट्यवधी लोक विनातिकीट प्रवास करतात, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. केवळ मध्य रेल्वे (Central Railway) झोनने मे २०२६ या एकाच महिन्यात सुमारे ४.९६ लाख विनातिकीट प्रवाशांकडून ४०.८५ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे. ही वाढती प्रवृत्ती रोखण्यासाठी आणि गाड्यांमधील गर्दी नियंत्रित करून प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा हा कठोर निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
महाराष्ट्र
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel




