
Political News : शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी शेतकरी नेतेरविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे. बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नवीन वर्षात रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार असून ते संसदेत जातील, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी 'एबीपी माझा'शी बातचीत करताना व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, "मी गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करतोय. त्यामुळे मी 100 टक्के संसदेत जाईलच. ज्या प्रश्नासाठी मी लढतोय, त्या प्रश्नाचं मूळ दिल्लीत आहे आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जायला पाहिजे आणि सरकारला आमचे प्रश्न सोडवायला भाग पाडलं पाहिजे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक लोकसहभागनं आणि लोक वर्गणीतून आम्ही लढणार आहोत."
|
|
'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर मी निवडणूक लढणार : रविकांत तुपकर
"100 टक्के मी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. 'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर मी निवडणूक लढणार, कारण मी फाटका माणूस, माझ्याकडं पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
"मी स्वतंत्र निवडणूक लढविणार. राजू शेट्टी नेहमीच प्रत्येक निवडणुकीत सहा जागा लढविण्याची घोषणा करतात. यावेळी माझ्या भागातील शेतकऱ्यांचा निर्णय आहे की, लढायचं आणि तेही स्वतंत्र. माझं न्यायालय शेतकरी आहे. त्यामुळे मी लढणार.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
माझी आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक नाही, जर... : रविकांत तुपकर
रविकांत तुपकर म्हणाले की, "नाही, माझी आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक नाही. जर जवळीक असती तर माझ्यावर इतके गुन्हे दखल झाले असते का? माझ्या आंदोलनामुळे सरकार घाबरलं आहे. माझ्या आंदोलनाला सरकार नेहमी घाबरतं, जर जवळीक असती तर, आता मला या सरकारनं एक वर्ष तुरुंगात टाकायचं षडयंत्र केलं आहे. मला एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितलं. आमच्याच काही लोकांनी अफवा पसरविली आहे की, माझी आणि त्यांची जवळीक आहे."
येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ : रविकांत तुपकर
"मला सर्वच पक्षांकडून ऑफर येत असते. माझी निवडणूक लढवण्याबद्दल राजू शेट्टींशी बातचीत झालेली नाही. आम्ही सोडलं तर शेतकऱ्यांबद्दल कुणीही बोलत नाही. माझं आयुष्य मी शेतकऱ्यांसाठी दिलं आहे, त्यामुळे माझ्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीतही लढाई राजवाडा विरुद्ध गावगाडा अशी असेल. गाव पातळीवर सध्या प्रस्थापित विरुद्ध रोष आहे. अनेक राजकारणी विरुद्ध मोठा रोष आहे, लोक कंटाळले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




