
Political News : शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी शेतकरी नेतेरविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे. बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नवीन वर्षात रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार असून ते संसदेत जातील, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी 'एबीपी माझा'शी बातचीत करताना व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, "मी गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करतोय. त्यामुळे मी 100 टक्के संसदेत जाईलच. ज्या प्रश्नासाठी मी लढतोय, त्या प्रश्नाचं मूळ दिल्लीत आहे आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जायला पाहिजे आणि सरकारला आमचे प्रश्न सोडवायला भाग पाडलं पाहिजे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक लोकसहभागनं आणि लोक वर्गणीतून आम्ही लढणार आहोत."
|
|
'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर मी निवडणूक लढणार : रविकांत तुपकर
"100 टक्के मी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. 'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर मी निवडणूक लढणार, कारण मी फाटका माणूस, माझ्याकडं पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
"मी स्वतंत्र निवडणूक लढविणार. राजू शेट्टी नेहमीच प्रत्येक निवडणुकीत सहा जागा लढविण्याची घोषणा करतात. यावेळी माझ्या भागातील शेतकऱ्यांचा निर्णय आहे की, लढायचं आणि तेही स्वतंत्र. माझं न्यायालय शेतकरी आहे. त्यामुळे मी लढणार.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
माझी आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक नाही, जर... : रविकांत तुपकर
रविकांत तुपकर म्हणाले की, "नाही, माझी आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक नाही. जर जवळीक असती तर माझ्यावर इतके गुन्हे दखल झाले असते का? माझ्या आंदोलनामुळे सरकार घाबरलं आहे. माझ्या आंदोलनाला सरकार नेहमी घाबरतं, जर जवळीक असती तर, आता मला या सरकारनं एक वर्ष तुरुंगात टाकायचं षडयंत्र केलं आहे. मला एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितलं. आमच्याच काही लोकांनी अफवा पसरविली आहे की, माझी आणि त्यांची जवळीक आहे."
येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ : रविकांत तुपकर
"मला सर्वच पक्षांकडून ऑफर येत असते. माझी निवडणूक लढवण्याबद्दल राजू शेट्टींशी बातचीत झालेली नाही. आम्ही सोडलं तर शेतकऱ्यांबद्दल कुणीही बोलत नाही. माझं आयुष्य मी शेतकऱ्यांसाठी दिलं आहे, त्यामुळे माझ्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीतही लढाई राजवाडा विरुद्ध गावगाडा अशी असेल. गाव पातळीवर सध्या प्रस्थापित विरुद्ध रोष आहे. अनेक राजकारणी विरुद्ध मोठा रोष आहे, लोक कंटाळले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज





























Subscribe to my channel




