वूमन्स एमर्जिंग आशिया कप 2026 स्पर्धेत इंडिया ए टीमची सुरुवात पराभवाने झाली. भारताला राधा यादव हीच्या नेतृत्वात आपल्या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात उलटफेरचं शिकार व्हावं लागलं. यूएईने भारतावर 13 फेब्रुवारीला 7 विकेट्सने मात केली होती. त्यामुळे भारतासाठी दुसरा सामना हा स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी करो या मरो असा झाला होता. मात्र भारताने अटीतटीच्या सामन्यात कमाल केली. भारताच्या अ संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान ए टीमचा धुव्वा उडवत विजयाचं खातं उघडलं आहे.
बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये या हा स्टेडियममध्ये या बहुप्रतिक्षित सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तानने या सामन्यात भारतासमोर 94 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 59 बॉलआधी सहज पूर्ण केलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली. वृंदा दिनेश ही भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तसेच अनुष्का शर्मा आणि तेजल हसबनीस या दोघींनीही बॅटिंगने विजयात योगदान दिलं.
सामन्यात काय झालं?
पाकिस्तानने टॉस जिंकून मोठ्या विश्वासाने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हर खेळता आलं नाही. भारताने पाकिस्तानला 18.5 ओव्हरमध्ये 93 रन्सवर ऑलआऊट केल. पाकिस्तानसाठी शव्वाल झुल्फिकार हीने सर्वाधिक 23 धावा केल्या. तर गुल रुख हीने 21 धावांचं योगदान दिलं. अनोश नासिर हीने अखेरच्या क्षणी 17 धावांचं निर्णायक योगदान दिलं. भारताकडून राधा यादव, प्रेमा रावत आणि सायमा ठाकोर या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळवल्या.
भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा
पाकिस्तानने 94 धावांचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच बॉलवर झटका दिला. हुमैरा काझी गोल्डन डक होऊन मैदानाबाहेर गेली. त्यानंतर वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्मा या जोडीने भारताच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 50 बॉलमध्ये 79 रन्सची पार्टनरशीप केली. अनुष्का शर्मा हीच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. अनुष्काने 24 धावा केल्या.
त्यानंतर वृंदाने तेजल हसबनीससह उर्वरित धावा जोडल्या आणि भारताला विजयी केलं. भारताने 10.1 ओव्हरमध्ये 97 रन्स केल्या. वृंदाने 29 बॉलमध्ये 12 चौकारांसह नाबाद 55 रन्स केल्या. तर तेजलने नाबाद 12 धावा केल्या. वृंदाला तिने केलेल्या नाबाद अर्धशतकासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




