टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2026 मधील मजबूत संघ मानला जातो. पण काल या टीमला टुर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हा वर्ल्ड कप खेळतेय. सुपर-8 राऊंडचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. या मॅचमध्ये भारताचा 76 धावांनी पराभव झाला. टी20 वर्ल्ड कपमध्ये रन्सच्या हिशोबाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवाने टीम इंडियाच्या सलग विजयाच्या सिलसिल्याला ब्रेक लावला. उलट टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग अधिक खडतर बनवला. टीम इंडियाला आता उलट सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकावेच लागतील. त्यानेही भागणार नाही.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 22 फेब्रुवारीला भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना झाला. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बाबतीत टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेसमोर फार काही चाललं नाही. गोलंदाजांनी टीमला चांगली सुरुवात दिली तसचं नंतर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीला लगाम घातली. दक्षिण आफ्रिकेने 187 धावा केल्या. वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून टीम इंडियाच्या बॅटिंगमध्ये पाहिजे तसा दम दिसलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर फलंदाजीची पोल-खोल झाली. टीम इंडियाचा डाव 111 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेने एका मोठ्या विजयाची नोंद केली.
सेमीफायनलच तिकिट कसं मिळणार?
या एका मॅचच्या निकालाचा सेमीफायनल प्रवेशावर परिणाम होणार आहे. टीम इंडिया एक पराभवासह करो या मरोच्या स्थितीत आहे. सुपर-8 राऊंडमध्ये प्रत्येक टीमला 3-3 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने आपला पहिला सामना गमावलाय. आता सेमीफायनलच तिकिट कसं मिळणार?. असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. पहिलं म्हणजे टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकावेच लागतील. टीम इंडियाचा पुढचा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध आणि शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 4 पॉइंट्स होतील.
दुसऱ्या टीम्सनी किती सामने गमावणं आवश्यक?
पण हे सर्व इतकं सोपं नाहीय.भारत आता अशा स्थितीत आहे की, फक्त जिंकून भागणार नाहीय, तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या तीन टीम पैकी कुठल्या दोन टीम्सनी 2-2 सामने गमावले पाहिजेत. अशावेळी टीम इंडियाचे 4 पॉइंट होतील. अन्य एका टीमचे 4 किंवा 6 पॉइंट होतील. अशा स्थितीत टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग सुकर होईल.
दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट किती?
भारताशिवाय अन्य दोन टीम्सचे 4-4 पॉइंट झाले तर सेमीफायनल प्रवेशासाठी दुसऱ्या मार्गाने निर्णय होईल. ICC च्या नियमानुसार, पॉइंट्स बरोबरीत असतील तर जास्त मॅच जिंकणारी टीम पुढे जाईल. तिन्ही टीम्सचे 2-2 पॉइंट झाले तर पेच फसेल. नेट रनरेटनेही टीम इंडियाची अडचण वाढवली आहे. 76 धावांनी पराभव झाल्यामुळे भारतीय टीमचा नेट रनरेट -3.800 झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट 3.800 आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढचे दोन सामने फक्त जिंकायचेच नाहीयत, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




