राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला नशेखोरीचा विळखा बसला आहे. या विळख्यातून मुंबईला मुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. सध्या मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रेल्वे पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्रमक पाऊले उचलल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला वांद्रे रेल्वे टर्मिनसवर पोलिसांनी कोट्यवधींचे चरस जप्त केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बोरिवलीत भाजप नगरसेवकाने स्वतः मैदानात उतरून नशेचा अड्डा उध्वस्त केला आहे. या दोन्ही कारवाईंमुळे मुंबईतील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. सध्या नशामुक्त मुंबईसाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्त आघाडी उघडल्याचे चित्र दिसत आहे.
वांद्र्यात मोठी कारवाई
मुंबईत वांद्रे रेल्वे पोलिसांनी गोरखपूर-मुंबई अवध एक्सप्रेसमधून होणाऱ्या एका मोठ्या चरस तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी दुपारी 4.15 वाजता ही गाडी वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक ४ वर आली होती. असे असताना एका सतर्क सफाई कर्मचाऱ्याला जनरल डब्यात एक बेवारस संशयास्पद बॅग आढळली होती. ही माहिती मिळताच रेल्वे पोलीस, आरपीएफ, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या बॅगेची तपासणी केली असता त्यात चरसचे ३१ पॅकेट्स सापडले. या चरसचे एकूण वजन १३ किलो ८३४ ग्रॅम इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त पाहून आरोपी बॅग सोडून पसार झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान २०२६ या वर्षांत इतक्या मोठ्या चरसचा साठा पकडण्याची रेल्वे पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहेत.
बोरिवलीत दोन तरुणांना चोप
तर दुसरीकडे, बोरिवली पश्चिम येथील ओल्ड एम.एच.बी. कॉलनी परिसर नशेबाजांचा अड्डा बनल्याच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवक शिवा शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी स्वतः मध्यरात्री या परिसरात धाड टाकली. या कारवाईदरम्यान दोन तरुण गांजा ओढताना रंगेहाथ पकडले. यावेळी नगरसेवकांनी या तरुणांना चोप देत त्यांच्याकडील गांजाचा साठा जप्त केला. नगरसेवक शिवा शेट्टी यांनी तातडीने भाजप आमदार संजय उपाध्याय यांना व्हिडीओ कॉलद्वारे माहिती दिली. त्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या बोरिवली विधानसभा क्षेत्र नशा मुक्त करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी स्वतः रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. याला बोरिवली पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



