IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या 4 अडचणी, जर सुधारणा केली नाही तर...Image Credit source: Asian Cricket Council
IND vs PAK, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना् भारत पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आतापासूनच लागून आहे. तसं पाहिलं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं पारडं जड आहे. पण खेळ म्हटलं तर काहीही होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. कारण एक चूक आणि पराभव हे निश्चित आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांनी या स्पर्धेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकून सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं करण्याचं दोन्ही संघांचा मानस आहे. असं असताना टीम इंडियाची कमकुवत बाजू या स्पर्धेतील दोन सामन्यात उघड झाली आहे. त्याचा फायदा पाकिस्तान घेऊ शकतो. खासकरून दुबळ्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गोष्टी तीव्रतेने दिसून आली. चला जाणून घेऊयात टीम इंडियाच्या 4 कमकुवत बाबी
अभिषेक शर्मा
अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू झाल्यानंतर चाहत्यांना नाराज केलं आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यामुळे दुसर्या सामन्यात खेळला नाही आणि पाकिस्तानविरूद्ध खेळेल की नाही ते माहिती नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढच्या एक दोन सामन्यात खेळणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढेल.
रिंकु सिंह
रिंकु सिंहचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. स्पर्धेपूर्वी त्याचा फॉर्म होता. मात्र अचानक त्याला नजर लागल्यासारखं वाटत आहे. पहिल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्या सामन्यात 14 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा करून बाद झाला. यात त्याने एकही चौकार किंवा षटकार मारला नाही. तर दुसऱ्या सामन्यात 6 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याची भीती वाटत आहे.
फिरकीचं जाळं
भारतीय संघ गेल्या काही महिन्यात फिरकीचा सामना करताना अडचणीत आल्याचं दिसून आलं आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गडदपणे अधोरेखित झालं. नामिबियाचे फिरकीपटू बर्नार्ड शोल्ट्ज आणि गेरहार्ड इरास्मस यांच्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज अडकले. पाकिस्तानकडे फिरकीची मजबूत फळी आहे. त्यांचा सामना करताना भारतीय फलंदाज अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
पावरप्लेमध्ये सुमार गोलंदाजी
पावरप्लेच्या सहा षटकात भारतीय गोलंदाजांनी निराशा केली आहे. नामिबियाने या सहा षटकात भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. नामिबियाने 6 षटकात 1 गडी गमवून 57 धावा केल्या. त्यावरून भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानविरुद्ध पावरप्ले निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे गोलंदाजांना अजून चांगलं काम करावं लागणार आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



