IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या 4 अडचणी, जर सुधारणा केली नाही तर...Image Credit source: Asian Cricket Council
IND vs PAK, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना् भारत पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आतापासूनच लागून आहे. तसं पाहिलं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं पारडं जड आहे. पण खेळ म्हटलं तर काहीही होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. कारण एक चूक आणि पराभव हे निश्चित आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांनी या स्पर्धेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकून सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं करण्याचं दोन्ही संघांचा मानस आहे. असं असताना टीम इंडियाची कमकुवत बाजू या स्पर्धेतील दोन सामन्यात उघड झाली आहे. त्याचा फायदा पाकिस्तान घेऊ शकतो. खासकरून दुबळ्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गोष्टी तीव्रतेने दिसून आली. चला जाणून घेऊयात टीम इंडियाच्या 4 कमकुवत बाबी
अभिषेक शर्मा
अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू झाल्यानंतर चाहत्यांना नाराज केलं आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यामुळे दुसर्या सामन्यात खेळला नाही आणि पाकिस्तानविरूद्ध खेळेल की नाही ते माहिती नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढच्या एक दोन सामन्यात खेळणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढेल.
रिंकु सिंह
रिंकु सिंहचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. स्पर्धेपूर्वी त्याचा फॉर्म होता. मात्र अचानक त्याला नजर लागल्यासारखं वाटत आहे. पहिल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्या सामन्यात 14 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा करून बाद झाला. यात त्याने एकही चौकार किंवा षटकार मारला नाही. तर दुसऱ्या सामन्यात 6 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याची भीती वाटत आहे.
फिरकीचं जाळं
भारतीय संघ गेल्या काही महिन्यात फिरकीचा सामना करताना अडचणीत आल्याचं दिसून आलं आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गडदपणे अधोरेखित झालं. नामिबियाचे फिरकीपटू बर्नार्ड शोल्ट्ज आणि गेरहार्ड इरास्मस यांच्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज अडकले. पाकिस्तानकडे फिरकीची मजबूत फळी आहे. त्यांचा सामना करताना भारतीय फलंदाज अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
पावरप्लेमध्ये सुमार गोलंदाजी
पावरप्लेच्या सहा षटकात भारतीय गोलंदाजांनी निराशा केली आहे. नामिबियाने या सहा षटकात भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. नामिबियाने 6 षटकात 1 गडी गमवून 57 धावा केल्या. त्यावरून भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानविरुद्ध पावरप्ले निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे गोलंदाजांना अजून चांगलं काम करावं लागणार आहे.
शहर
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
महाराष्ट्र
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



