मुंबई: पोलीस म्हणाले ‘समुद्रात जाऊ नका’तरीही दुर्लक्ष; अर्नाळा बीचवर नालासोपाऱ्यातील चार मुलांचा बुडून मृत्यू

मुंबई: वसई-विरारमधील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रात उतरू नका, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिल्यानंतरही चार मुले पाण्यात उतरली आणि ती समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेली. या दुर्घटनेत चौघांचाही मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चारही मुले नालासोपारा परिसरातील होती. समुद्रात भरती आणि धोकादायक परिस्थिती असल्याने पोलिसांनी पर्यटकांना वारंवार सावध केले होते. मात्र, इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून ही मुले समुद्रात उतरली. काही क्षणांतच जोरदार लाटांनी त्यांना खोल पाण्यात ओढून नेले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक बचाव पथके आणि नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर विशेष काळजी घेण्याचे आणि सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *