
Farmer Suicide : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत. आता पुन्हा एकाच दिवशी दोघांनी बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून जीवन संपवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते आणि परभणीच्या जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरातील विलास रामराव रोकडे (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
नांदेडच्या आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते या शेतकऱ्याने नापिकी व कर्जामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) रोजी पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असतानाच त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. हज्यपा मष्णाजी झेलते हा अल्पभूधारक शेतकरी आहे. तसेच शेतमजूरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अती तर कधी कमी पावसामुळे शेतातील पिके वाया गेली. त्यामुळे शेतातील पिकांवर काढलेले कर्ज कसे फेडायचे या तणावात हज्यपा असायचे. दरम्यान, शनिवारी घरातील सर्वजण रात्री राहत्या घरी झोपी गेला. यानंतर रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असतानाच त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सकाळी उठल्यावर घरच्यांना हज्यपाने आत्महत्या केल्याचे समजले.
|
|
परभणीत देखील शेतकरी आत्महत्या...
दुसरी आत्महत्या परभणीच्या जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरातील समोर आली आहे. विलास रामराव रोकडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उतारात मोठी घट आली आहे. त्यामळे येणारी दिवाळी कशी साजरी करायची?, बँकेचे कर्ज कसे फेडायचे?, संसाराचा गाडा कसा चालवावा?, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, पिकाचा खर्च, तसेच औषधाची उधारी कशी फेडायची? अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. या विवंचनेतन त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
परिस्थिती भयंकर...
मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात सतत अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच यंदा काही तरी हातात येईल अशी अपेक्षा असतांना पावसाने पाठ फिरवली आणि अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. हिवाळ्यात अशी अवस्था असून, उन्हाळ्यात परिस्थिती भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासून पाण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, त्यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




