आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 19 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रदर्शनासाठी अवघा महिना शिल्लक राहिला असताना सीक्वेलविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. ‘धुरंधर 2’मध्ये सर्वांत मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलाविषयीची माहिती समोर आल्यानंतर दिग्दर्शक आदित्य धरने नमतं घेतलं की काय, अशी चर्चा होत आहे.
‘धुरंधर’ हा चित्रपट त्याच्या रनटाइममुळे प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला होता. रणवीर सिंहचा हा चित्रपट 3 तास 34 मिनिटांचा होता. इतका मोठा चित्रपट प्रेक्षकांना पूर्णवेळ खुर्चीला खिळवून ठेवू शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याचं उत्तर सर्वांनाच मिळालं. बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करून या चित्रपटाने बऱ्याच गोष्टी सिद्ध केल्या. अगदी शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत प्रेक्षक थिएटरमध्ये थांबल्याचं पहायला मिळालं होतं.
आता सीबीएफसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ‘धुरंधर 2’ला 9 फेब्रुवारी रोजी प्रमाणपत्र देण्यात आलं. या तपशीलांवरून असं दिसून येतंय की या सीक्वेलची लांबी ही पहिल्या भागापेक्षा थोटी कमी आहे. हा फरक तसा फार मोठा नाही, तो फक्त 6 मिनिटांचा आहे. ‘धुरंधर 2’चा रनटाइम 3 तास 28 मिनिटांचा आहे.
‘धुरंधर’ला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ प्रमाणपत्र दिलं होतं. म्हणजेच तो चित्रपट फक्त प्रौढांसाठीच योग्य होता. त्यातील हिंसक दृश्ये अत्यंत क्रूर आणि भयानक पद्धतीने दाखवण्यात आली होती. त्यामुळे त्याला ‘अ’ प्रमाणपत्र मिळणंच योग्य होतं. परंतु ‘धुरंधर 2’मध्ये झालेला मोठा बदल म्हणजे या सीक्वेलला U/A 16+ अशी रेटिंग मिळाली आहे. पहिल्या भागानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागात अधिक हिंसाचार दिसेल असं वाटलं होतं. परंतु या रेटिंगवरून हे स्पष्ट होतंय की सीक्वेलमधील सीन्स पहिल्या भागाइतकी तीव्र किंवा हिंसक नाहीत. पहिल्या भागात दाखवलेल्या हिंसेवरून अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे दिग्दर्शक आदित्य धरने एक पाऊल मागे घेतलं की काय, अशी चर्चा होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



